
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान काही आमदारांकडून सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा सुरक्षेत तैनात पोलिसांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केलेल्या अहवालात या गंभीर प्रकारांचा उल्लेख असून, न
.
विधानसभा सुरक्षेतील पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांकडे सादर केलेल्या अहवालात म्हटले की, अनेक आमदार सभागृहात जाण्यापूर्वी विधानभवनाच्या लॉबीत आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन येतात. याठिकाणी कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या जातात, तसेच फोटो सेशन्सही घेतले जातात. ही कृती कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित नसून सर्वच पक्षांतील आमदारांकडून अशा घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.
नियम पायदळी, सुरक्षा रक्षकांची अडचण
लॉबीत प्रवेशासंबंधी स्पष्ट नियम असून, केवळ अधिकृत शासकीय स्वीय सहाय्यकांनाच आमदारांसोबत प्रवेश दिला जाऊ शकतो. मात्र प्रत्यक्षात कार्यकर्ते आणि इतर लोक उपस्थित राहतात. सुरक्षा रक्षक या नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करताच, त्यांना कारणे देऊन दुर्लक्ष केले जाते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पासशिवाय वाहनांना विधानभवनात प्रवेश
तसेच अनेक आमदार आपल्या गाडीतून विधानभवनात पास नसताना एन्ट्री देत असल्याचे देखील समोर आले आहे. आमदारांची सुरक्षा लक्षात घेता याबाबत वेळोवेळी सूचना करून देखील आमदार ऐकत नसल्यानेच याबाबतचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
दरम्यान, याबाबत ओळखपत्र पाहिल्याशिवाय कुणालाही विधानभवनात सोडू नये, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्रालय सुरक्षा पोलिसांना दिल्या आहे. तर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी आणि सदस्य लॉबीतही फक्त स्वीय सहाय्यकांना ओळखपत्र तपासूनच सोडण्यात यावे, असा सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा…
विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या निलंबनाची मागणी:समोरच्या बाकाकडे पाहून हातवारे व इशारे केल्याचा आरोप; जाधवांवरही ठपका
राज्य विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजे विधानसभेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे व भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर समोरच्या बाकांकडे पाहून हातवारे व इशारे करण्याचा आरोप केला. अध्यक्षांच्या बाबतीत त्यांनी केलेले विधान हे अध्यक्षांचा अवमान आहे, असे ते म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…
मंत्रालय, नाशिक, ठाणे हनीट्रॅपचे केंद्र:नाना पटोले यांचा गंभीर आरोप, सभागृहात पेनड्राईव्ह दाखवला; सरकारवर स्पष्टीकरण न देण्याचा आरोप
राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या घटनेमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरूवारी सलग दुसऱ्यांदा हा विषय हा विषय विधानसभेच्या पटलावर मांडला. तसेच या प्रकरणी सभागृहाच्या अध्यक्षांनी निर्देश दिल्यानंतरही सरकार स्पष्टीकरण देत नसल्याचा आरोप केला. दरम्यान, राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पटोले म्हणतात तसे काही घडलेच नसल्याचा दावा करत आपल्या तोंडावर बोट ठेवले आहे. पूर्ण बातमी वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.