
शिवसेनेचा आज 59 वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मेळावा वरळीतील एनएससीआय डोम येथे सुरू आहे. एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत.
.
कार्यक्रमादरम्यान खासदार मिलिंद देवरा आणि श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेण्यात आली. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरबाबत आपली बाजू मांडण्यासाठी सात शिष्टमंडळांना परदेशात पाठवण्याची योजना आखली. या योजनेत शिवसेनेच्या दोन नेत्यांना संधी मिळाली. या संदर्भात मिलिंद देवरा आणि श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेण्यात आली.
संधी न मिळाल्याने शिंतोडे उडवले जात आहेत- श्रीकांत शिंदे
यावेळी खासदारांना विचारण्यात आले की, अनेक नेत्यांनी हे शिष्टमंडळ केवळ मौजमजा करण्यासाठी परदेशात गेल्याची टीका केली. यावर बोलतांना श्रीकांत शिंदे म्हणाले की, तुम्हाला तुमच्या लायकीच्या हिशोबाने संधी देण्यात आली नाही, म्हणून दुसऱ्याच्या नावाने शिंतोडे उडवले जात आहेत.
काँगोमध्ये जिथे गृहयुद्ध सुरू आहे. तिथे एका उद्योगपतीला गोळ्या झाडून मारण्यात आलं आणि एक आयसीयूत होता. पुढे सीरीया लिऑनला मंकीपॉक्स हा आजार पसरत होता. आम्ही गेलो तेव्हा तिथे आजार मोठ्या प्रमाणावर पसरत होता. पण ज्यांना वाटतं की, आम्ही मौजमजेसाठी गेलो होतो, त्यांचे मी उद्याच तिकीट करतो आणि त्यानंतर मी त्यांना त्यांचा अनुभव शेअर करण्यास सांगतो.
असीम मुनीर आणि संजय राऊत यांना कुणीही सीरीयस घेत नाही- देवरा
एका पेपरमध्ये टीका झाली की, अमेरिकेत तुम्हाला कुणी भेटलं नाही? असे विचारले असता मिलिंद देवरा म्हणाले की, पाकिस्तानचे असीम मुनीर आणि महाराष्ट्र मुंबईतील संजय राऊत यांना वरळीपासून ते वॉशिग्टनपर्यंत कुणीही सीरीयसली घेत नाही.
एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये बंड केले
एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये आपल्या 40 समर्थक आमदारांसह बंड केले. या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितला. यानंतर कोर्टकचेऱ्या झाल्या. निवडणूक आयोगाच्या पुढ्यातही हे प्रकरण गेले. तिथे आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना दिले. यामुळे ठाकरे कुटुंबीयांच्या हातातूनच शिवसेना निसटली. त्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट दोघेही शिवसेना पक्षाचे वर्धापन दिन आणि दसरा मेळावा वेगवेगळे साजरे करत आहेत.
ही बातमी पण वाचा…
शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात लढा उभारावा लागेल – अंबादास दानवे; उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सायन येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या दिवशी उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीबाबत काय घोषणा करतात? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे हे आपल्या निवासस्थानावरून मेळाव्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांची कर्ज मंजूर का होत नाही, यासाठी 23 जूनपासून प्रत्येक बँकेत धडक मारणार असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले. शेतकऱ्यांच्या सिव्हिलबाबत सरकार खोटे बोलत आहे. आजही सिव्हिल तपाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते, असा दावाही अंबादास दानवे यांनी केला. पिक कापणी प्रयोगावर पीकविमा मंजूर होणार आहे. वाचा सविस्तर बातमी…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.