digital products downloads

शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट, राज्य सरकारची मान्यता, पण कोल्हापूरातील ‘हे’ तालुके….

शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट, राज्य सरकारची मान्यता, पण कोल्हापूरातील ‘हे’ तालुके….

Shaktipeeth Expressway: बहूचर्चित शक्तिपीठ महामार्गाबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शक्तीपीठ महामार्गाला शासनाने मान्यता दिली आहे. प्रकल्प हाती घेण्यास, आखणीस आणि भूसंपादनासाठी राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सांगली या आखणीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील आखणी रद्द करण्यात आली आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत सरकार चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. 

शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील एकूण 12 जिल्ह्यातील 29 तालुके आणि 370 गावांतून जाणार आहे. सुरुवातीला कोल्हापूरातील शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्गाची कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड आणि आजरा तालुक्यातील अधिसूचना रद्द केली होती. तर, जूनमध्ये पार पडलेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला पुन्हा मान्यता देण्यात आली. 

12 जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना  जोडणार आहे.  हा महामार्ग 805 किमीचा असणार आहे. 

कोणत्या देवस्थांनाना जोडणार?

 या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर व कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. तसेच संतांची कर्मभूमि असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाईस्थित मुकूंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच 12 ज्योर्तिलिंगापैकी 2 औंढानागनाथ व परळी वैजनाथ, महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, यासह कारंजा-लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.  

FAQ

1. शक्तीपीठ महामार्ग काय आहे?

शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत 805 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे. हा मार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणार आहे.

2. कोणत्या जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे?

हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून, 29 तालुके आणि 370 गावांतून जाणार आहे.

3. शक्तीपीठ महामार्गाला शासनाची मंजुरी मिळाली आहे का?

होय, राज्य सरकारने या महामार्गाच्या प्रकल्पाला, आखणीस आणि भूसंपादनासाठी मंजुरी दिली आहे. पवनार ते सांगली या टप्प्यासाठी भूसंपादनाला अंतिम मंजुरी मिळाली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp