digital products downloads

शरद पवारांचा कधी कधी आम्हालाही राग येतो: पण प्रामाणिकपणाने सांगतो बोलताना शब्द जरा जपून वापरा, आव्हाडांनी राऊतांना निशाणा – Mumbai News

शरद पवारांचा कधी कधी आम्हालाही राग येतो:  पण प्रामाणिकपणाने सांगतो बोलताना शब्द जरा जपून वापरा, आव्हाडांनी राऊतांना निशाणा – Mumbai News


दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला होता. या सत्कारावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांचे गुणगान गायले होते. यानंतर संजय राऊत तीव्र नाराज झाले होते. त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका देखील केली

.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, पवार साहेबांची उंची,महाराष्ट्रातील देशातील त्यांचं राजकारणातील स्थान, त्यांच्याशी विचारांची उंची ही अतुलनीय आहे. शरद पवार या देशात असे राजकारणी आहेत की त्यांच्या मनात सूड,द्वेष कधीच निर्माण होत नाही. आम्हाला कधी कधी राग येतो की हे असे का करतात. पवार साहेब कुठल्या व्यासपीठावर जातात याचा कोणी विचारही करू नये. प्रामाणिकपणाने सांगतो शब्द जरा जपून वापरा, हे विश्वासघातकी वगैरे आम्ही ऐकून घेतो हा काय शब्द आहे का? असं काय मोठं केलंय त्यांनी.

…तर शरद पवार तुमच्यापेक्षाही जास्त आक्रमक असतील जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, ज्या माणसाने पवार साहेबांना राजकारणात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्ष, निशाणी पळवली सर्व केले. पण त्यांच्यासोबत स्टेज शेअर करताना त्यांच्या मनात आसूड आणि चिड दिसत नाही. हे खरे तर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी शिकण्यासारखे आहे. खोट्या पोलिस केसेस टाक, खोटे गुन्हे टाक, त्यांच्या राजकीय आयुष्य बरबाद करण्यासाठी काम कर, निधी बंद करुन टाक असे सुरू झाले आहे. ते पवार साहेबांना स्पर्श सुद्धा करत नाही, पवार साहेब कुठल्या व्यासपीठावर जातात याचा कोणी विचारही करू नये. जेव्हा लढायची वेळ येईल.. त्यावेळी शरद पवार साहेब तुमच्यापेक्षा जास्त आक्रमक असतील.

जिथे वार करायचा तिथे पवार साहेब करतात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब हे उदाहरण आहे. राजकारण म्हणजे फक्त, सूड, द्वेष, संपवून टाका, मारून टाका असे नाही. आपण सर्व एकमेकांना भेटता, एकनाथ शिंदे मला अपॉइंटमेंट देत नाही ती गोष्ट वेगळी, अजित पवार मला केबिनमध्येच घेणार नाही, पण मी अनेक पत्र पाठवून झाली आहे. एकनाथ शिंदे भेटल्यावर एकच सांगतात की परवा, पण त्यांचा परवा कधीच येत नाही, असा टोला आव्हाड यांनी महायुती सरकारमधील मंत्र्यांना लगावला. अमित शहा याला तडीपार बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती, पण पवार साहेब बोलले, त्यांना जिथे वार करायचा तिथे ते करतात, असेही आव्हाड म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp