
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचे सिद्ध करून दाखवा, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी महायुतीला दिले आहे. मनोज जरांगेंच्या मागे कुणाचा हा
.
मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी गत शुक्रवारपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती काहीशी बिघडली असताना सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्या आंदोलनामागे महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार यांच्या पक्षाचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी महायुतीला वरील आव्हान दिले आहे.
काय म्हणाले शशिकांत शिंदे?
शशिकांत शिंदे म्हणाले, राज्याचे गृहखाते भाजपकडे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असेल तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. शरद पवार या प्रकरणी काही बोलले नाही, तर सत्ताधारी पक्षाचे नेते त्यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करतात. तसेच या आंदोलनामागे त्यांचा अदृश्य हात असल्याचाही आरोप करतात. आता मनोज जरांगे यांच्या मागे नक्की कुणाचा हात आहे की ते व मराठे स्वयस्फुर्तीने आलेत हे सरकारने बघावे. या प्रकरणी लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करू नये.
शशिकांत शिंदे यांनी यावेळी सरकारला हे आंदोलन गांभीर्याने घेण्याचेही आवाहन केले आहे. माझी सरकारला विनंती आहे. या प्रकरणी कुणाची काय भूमिका आहे हे न पाहता त्यांनी हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावे. त्या समितीच्या अहवालाची वाट न पाहता सरकारच्या समितीने बैठक घेऊन तत्काळ निर्णय घ्यावेत, असे ते म्हणालेत.
सरकार जरांगेंच्या मागण्यांवर सकारात्मक – फडणवीस
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना सरकार मनोज जरांगेंच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचा दावा केला आहे. सरकार मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्याकडे सकारात्मकपणेच पाहत आहे. या प्रकरणी कुठेही नकारात्मकता नाही. पण कुठलीही मागणी मान्य करायची, तर ती कायद्याच्या चौकटीत बसायला हवी. आता सरसकट ओबीसीमध्ये समावेश वैगेरे, अशा ज्या काही गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्याकडे सामाजिक बांधिलकीचाही प्रश्न आहे. कारण न्यायालयाचे काही निर्णय आले आहेत. त्या निर्णयांचाही आपल्याला अवमान करता येणार नाही. यामुळे मला असे वाटते की, कायद्याच्या चौकटीत जे काही बसते ते निर्णय घेण्यासाठी सरकार तयार आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन असाच निर्णय करा, असे कुणी म्हटले तरी, सरकारने खूश करण्यासाठी असा निर्णय घेतला, तरी तो एक दिवसही टिकणार नाही. मग त्यात मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल. यामुळे आम्ही चर्चा करत आहोत. एवढेच नाही तर आमच्या विखे पाटल्यांच्या नेतृत्वात उप समितीत चर्चा सुरू आहे. एजींसोबत चर्चा सुरू आहे. कायदेशीर सल्लागारांसोबत चर्चा सुरू आहे. जे काही न्यायालयाचे निर्णय आहेत. त्याचीही पडताळणी सुरू आहे. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे फडणवीस म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.