digital products downloads

शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी पिलावळीचे विचार पेरले: राऊत विचारांचा चिखल करतायत, त्यातूनच कमळ फुलणार- नवनाथ बन – Mumbai News

शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी पिलावळीचे विचार पेरले:  राऊत विचारांचा चिखल करतायत, त्यातूनच कमळ फुलणार- नवनाथ बन – Mumbai News


काल शिवतीर्थावर वैचारिक मेळावा नव्हता तर ज्यांची वैचारिक सुंता झाली आहे अशा लोकांचा मेळावा होता. काल बाळासाहेब ठाकरे यांना वाईट वाटले असेल की ज्या मैदानावरून आपण हिंदुत्व आणि प्रभू श्री.रामाचे गुणगान गात होतो तिथे आपल्या मुलाने खानाच्या पिलावळीचे विच

.

नवनाथ बन म्हणाले की, पगारी संपादक संजय राऊत यांनी चिखलाबद्दल बोलूच नाही. विचारांचा चिखल करण्याचा काम तुम्ही शिवतीर्थावर केले आहे. परंतू इतिहास असा आहे की जेव्हा जेव्हा असा वैचारिक चिखल वाढतो तेव्हा कमळाचा उदय होते. तुम्ही काल जो चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलात त्याला उत्तर म्हणून मुंबईकर कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाही. तुमची वैचारिक चिखलफेक आम्ही काल बघितली. याला उत्तर जनता मनपा निवडणुकीत दिसून येईल.

राऊतांमुळे ठाकरे कुटुंब दुरावले

नवनाथ बन म्हणाले की, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा पराभव करताना तुमच्या भावना कुठे गेल्या होत्या. अमित ठाकरे यांचा पराभव तुमच्या पक्षाने केला तेव्हा तुम्हाला प्रेम नव्हते. राज ठाकरेंबद्दल तुमची जवळीक नव्हती? तुम्ही म्हणता पटकन जवळ आलो त्यासाठी 16 वर्षे लागली आहेत. संजय राऊत राज ठाकरेंना तुम्ही आपले म्हटले असते तर दुसरे शिवतीर्थ बांधण्याची वेळच आली नसती. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यामुळेच दुसरे शिवतीर्थ बांधण्याची वेळ आली. तुमच्यामुळेच अमित ठाकरेंचा पराभव झाला. तुमचे राज ठाकरेंवर प्रेम असते तर वरळीमध्ये जसे पहिल्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता तेवढी दानत तुम्ही अमित ठाकरेंबद्दल ठेवली नाही. राऊतांमुळेच मातोश्री 2 बांधण्याची वेळ आली. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या भावामध्ये भांडण लावण्याचे काम संजय राऊत करत आहे.

उद्धव ठाकरेंना खानाची काळजी

नवनाथ बन म्हणाले की, सोनिया गांधी राजकारणात आल्या होत्या त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी एक सवाल केला होता तुम्हाला रामराज्य हवे आहे की रोम राज्य? आज तोच सवाल पुन्हा विचारण्याची वेळ आली आहे की, तुम्हाला खान हवाय की प्रभू श्री.राम यांचा बाण हवाय. ज्या पद्धतीने दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरुन उद्धव ठाकरे यांनी भाषण केले आहे, त्यावरुन मला वाटते की आता त्यांना खानावळी बद्दल जास्त महत्त्व वाटत असून प्रभू श्री.रामाच्या बाणा बद्दल त्यांना वाईट वाटत आहे. उद्धव ठाकरेंचे पगारी संपादक संजय राऊत हे तर भाजपवर टीका करतच असतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. तर मुंबईकरांना खानावळ हवी की प्रभू श्री.रामाचा बाण हवा आहे कारण उद्धव ठाकरे काल ज्या पद्धतीने हिंदुत्वावर, संघावर आणि भाजपवर टीका करत होते. यातून त्यांना प्रभू श्री.रामाचा बाण नको तर खान हवा आहे हे जाणवले. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने विचारांचे सोने लुटायचे असते पण उद्धव ठाकरे यांनी खानाचे विचार देण्याचे काम केले. अफज़ल खानाच्या प्रवृत्तीचे विचार वाटण्याचे काम उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून केले आहे.

उद्धव ठाकरेंनी पिलावळीचे विचार पेरले

नवनाथ बन म्हणाले की, एका बाजूला बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाच्या बाजूने धडाडणारी तोफ आणि आता दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी खानाची पिल्लावळ आणि त्यांचे विचार सांगण्याचे काम शिवतीर्थावरुन केले. बाळासाहेब ठाकरे यांची समाधी तिथेच आहे, त्यांना काल वाईट वाटले असेल की या शिवतीर्थावरुन मी प्रभू श्री.रामाचे गुणगान गात होतो आणि हिंदुत्वाचे विचार पेरत होतो आणि आज आपला मुलगा उद्धव ठाकरे पिलावळीचे विचार पेरण्याच काम करत आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp