digital products downloads

शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 50 कोटींची मदत: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्वितीय टप्प्याचे लोकार्पण; फडणवीस म्हणाले – प्रेरणादायी केंद्र ठरेल – Pune News

शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 50 कोटींची मदत:  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्वितीय टप्प्याचे लोकार्पण; फडणवीस म्हणाले – प्रेरणादायी केंद्र ठरेल – Pune News

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या द्वितीय टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटी रु

.

कार्यक्रमाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, शिवसृष्टी हे केवळ पर्यटन केंद्र नसून छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करण्याचे केंद्र आहे. शिवरायांचे लढवय्येपण, स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचा पुरस्कार, पर्यावरणप्रेम, युद्धकौशल्य आणि प्रशासकीय कौशल्य अशा विविध पैलूंचे दर्शन येथे घडणार आहे.

त्यांनी देशविदेशातील अनेक प्रकल्पांशी तुलना करत शिवसृष्टीची वेगळी ओळख अधोरेखित केली. राष्ट्राभिमानी आणि इतिहासप्रेमी पिढी घडवण्यात शिवसृष्टी महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याने शिवसृष्टीला भेट देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसऱ्या टप्प्याच्या निर्मितीमध्ये ८७ कोटी रुपये गुंतवणूक

प्रास्ताविक करताना जगदीश कदम यांनी शिवसृष्टीमध्ये साकारण्यात आलेल्या आणि नजीकच्या भविष्यात साकारल्या जाणाऱ्या गोष्टींची माहिती उपस्थितांना दिली. शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या निर्मितीमध्ये सुमारे रुपये ८७ कोटी इतकी गुंतवणूक करण्यात आली असून स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्वाची ३ तत्वे यावर या टप्प्याच्या निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.

शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 50 कोटींची मदत: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्वितीय टप्प्याचे लोकार्पण; फडणवीस म्हणाले - प्रेरणादायी केंद्र ठरेल - Pune News

गंगासागर तलावात विविध किल्ल्यांवरून आणलेले पाणी अर्पण

शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या गंगासागर तलावात रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड या किल्ल्यावरून आणलेले पाणी आज मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथून पाठविलेल्या पाण्याचा कलश, तुळापूर त्रिवेणी संगमांवरील पाणी आणि नर्मदा नदीचे पाणी देखील यावेळी गंगासागरला अर्पण करण्यात आले. यापैकी रायगडावरील पाणी हे घोडेस्वारांनी आणले आहे ही विशेष बाब आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp