
छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर परिसरात नुकताच सुरु करण्यात आलेला भुयारी मार्ग (अंडरपास) पहिल्याच पावसात बंद पडला. रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे या मार्गावर पाणी साचले आहे. पावसाचे पाणी वॉटर आउटलेटद्वारे बाहेर जाण्याऐवजी भिं
.
मुसळधार पावसामुळे भुयारी मार्गात पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाणी वाहून नेण्यासाठी करण्यात आलेले आऊटलेट प्रभावी ठरण्याऐवजी बंद अवस्थेत आहेत, परिणामी संपूर्ण पाणी तड्यांमधून झिरपून बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे.
पाणी वॉटर आउटलेटमधून येण्याऐवजी तडे गेलेल्या भिंतीतून येत आहे
काही महिन्यांपूर्वीच झाले होते उद्घाटन
भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. या भुयारी मार्गाचे उद्घाटन काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटात करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात ही सुविधा निकामी ठरल्याने महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवरही टीकेची झोड उठत आहे.

तब्बल 6 महिने काम लांबले
दरम्यान, महानगरपालिकेच्या पाच ड्रेनेजलाइन वारंवार फुटत होत्या. महावितरण विभागाची (एमएसईबी) हाय टेन्शन लाइन जोडणीला उशीर झाला. भारतीय मध्य रेल्वे विभागाच्या बॅाक्सचे काम संथगतीने पूर्ण केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) लाइनमुळे सहा महिने काम लांबले.
प्रकल्प अपूर्ण, भुयारी मार्ग पूर्ण
शिवाजी नगर परिसरातील 200 मीटर लांबीचा हा रेल्वे भुयारी मार्ग आहे. यामध्ये 3.5 मीटर मार्गाची उंची आहे. या मार्गासाठी 11.47 कोटी निधी खर्च झाला. या भुयारी मार्गासाठी 6.91 कोटी रुपयांचे भूसंपादन करण्यात आले. 15 ऑक्टोबर 2023 ते 15 ॲाक्टोबर 2024 प्रकल्पाचे काम वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, 6 महिने काम रखडल्याने हा मार्ग खुला होण्यासाठी 18 महिने लागले. तीन महिन्यांपूर्वी हा भुयारी मार्ग पूर्ण होऊन खुला झाला असला, तरी प्रकल्प मात्र अद्याप अपूर्णच आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.