digital products downloads

शेतकरी पॅकेजवरून विरोधकांचा हल्लाबोल, 31 हजार कोटी रुपये सरकार कसे उभे करणार?

शेतकरी पॅकेजवरून विरोधकांचा हल्लाबोल, 31 हजार कोटी रुपये सरकार कसे उभे करणार?

Farmer Package : राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून या पॅकेजवर टीका करण्यात आलीय. 31 हजार कोटी रुपये सरकार कसे उभे करणार असा सवाल सामनामधून करण्यात आला आहे. तर रोहित पवारांनीही शेतकरी मदतीच्या या पॅकेजवरून सरकाला धारेवर धरलंय. 

Add Zee News as a Preferred Source

मराठवाड्यासह सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा बसला. यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय.. घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचे संसंर उद्घस्त झालेत. या पूरग्रस्तांसाठी सरकारने 31 हजार 658 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलय. मात्र याच मतदीच्या पॅकेजवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आलीये. 31 हजार कोटींचं पॅकेजमध्ये म्हणजे आकडे मोठे, मदत खोटी’ असा हल्लाबोल सामनातून करण्यात आलाय. ’31 हजार कोटी सरकार कसे, कधी उभे करणार?’ असा सवालही सामनातून विचारण्यात आलाय.

राज्य सरकारचे 31 हजार 628 कोटींचे पॅकेज म्हणजे ‘आकडे मोठे, मदत खोटी’ असा प्रकार आहे. हे 31 हजार कोटी सरकार कसे आणि कधी उभे करणार? ते प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात कधी पडणार? ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे या पॅकेजची कुऱ्हाड इतर कोणत्या कल्याणकारी योजनांवर पडणार आहे? केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीचे काय? राज्यातील सत्ताधाऱ्यांची त्याबाबत दातखिळी का बसली आहे? कर्जमाफीचे काय? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यापैकी एकाचेही उत्तर राज्य सरकारचे हे धूळफेक पॅकेज देत नाही. राज्यकर्ते आकड्यांचा ‘खेळ’ खेळत आहेत आणि त्या खेळात आधीच अतिवृष्टीचे पाणी नाकातोंडात गेलेल्या बळीराजाचा जीव जात आहे. पॅकेजच्या नावाखाली बळीराजाची क्रूर चेष्टा करणाऱ्या या सरकारचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे!

सामनामधून सरकारवरने जाहिर केलेल्या या पॅकेजवर टीका केल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी राऊतांचा समाचार घेतलाय. चांगल्या कामावर विरोधात बोलणार नाहीत ते संजय राऊत कसले असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी संजय राऊतांना लगावलाय. तर दुसरीकडे सरकारने ही मदत जाहिर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. सरकारचे आकडे खोटे आहेत. हे सरकार नायक नाही तर खलनायक असल्याचं म्हणत रोहित पवारांनी सरकारवर शरसंधान साधलंय.

सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देत मोठं पॅकेज जाहिर केलंय. मात्र या वरून विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. तेट सरकारने जाहिर केलेले आकडे फसवे असल्याचा आरोपच विरोधकांनी केलाय. सत्ताधारी आणि विरोधकांचं राजकारण सुरूच राहिल. मात्र आता गरज आहे ती आपल्या बळीराजला लवकरात लवकर मदत मिळण्याची. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची ही रक्कम जमा व्हावी हि अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

FAQ : 

राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणतं पॅकेज जाहीर केलं आहे?
उत्तर: राज्य सरकारने मराठवाडा, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांतील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी ३१ हजार ६५८ कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं आहे. यात शेती पिकांचं नुकसान, घरांचं उद्ध्वस्त होणं यासाठी मदत मिळेल.

या पॅकेजवर विरोधकांनी काय टीका केली आहे?
उत्तर: विरोधकांनी हे पॅकेज ‘आकडे मोठे, मदत खोटी’ असल्याचा आरोप केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला असून, ३१ हजार कोटी रुपये सरकार कसं आणि कधी उभं करणार, ही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात कधी पडेल, असा सवाल विचारण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखात कोणत्या प्रश्नांना हात घातला गेला आहे?
उत्तर: सामनातून विचारलेले प्रश्न: हे पॅकेज ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे इतर कल्याणकारी योजनांवर परिणाम करेल का? केंद्र सरकारची आर्थिक मदत काय? कर्जमाफीचं काय? राज्य सरकारचं हे पॅकेज धूळफेक आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp