digital products downloads

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका: अंबादास दानवेंचा सरकाला इशारा; केंद्राला अजून प्रस्ताव का पाठवला नाही? असा केला सवाल – Hingoli News

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका:  अंबादास दानवेंचा सरकाला इशारा; केंद्राला अजून प्रस्ताव का पाठवला नाही? असा केला सवाल – Hingoli News


राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमीनी खरडून गेल्या. पिकांचे नुकसान झाले. जनावरेही वाहून गेली. या परिस्थितीतही केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली. पण राज्याचा प्रस्ताव अद्याप का गेला नाही असा प्रश्‍न आहे. केंद्र व राज्य सरकारने अडचणीत सापडलेल्या श

.

हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीनंतर अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, माजी खासदार ॲड. शिवाजी माने, सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे, जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, राजेश पाटील गोरेगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही शासनाकडून मदत जाहिर झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी त्यांना मदतीचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. मात्र अद्यापही प्रस्ताव का गेला नाही? त्यातून राज्य शासनाची नियत खराब असल्याचे स्पष्ट होते. केंद्राने जाहीर केलेली २५०० कोटी रुपयांची मदत गेली कुठे? असा सवालही त्यांनी केला. सरकारला शेतकऱ्यांच्या दुःखाशी देणे घेणे नाही, असा आरोपही त्यांनी केला.

मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा काढला जाणार आहेत. त्यापूर्वी ता. ८ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबद्दल बोलताना त्यांना सरकारवर टिका केली. शेतकऱ्यांनी त्यांची एक इंचही जमीन मोजू देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्‍नावर लवकरच आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलतांना ते म्हमाले की, पुणे येथे पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. जनतेचे रक्षण करणाऱ्यांवरच हल्ले होत असतील तर न्याय मागायचा कोणाकडे असा सवाल त्यांनी केला. राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे सुपाऱ्या घेणारा अधिकारी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp