
Maharashtra Government Survey: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारला 5 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात सरकार समोर अनेक आव्हान आली तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने काही योजना आणून त्यामाध्यमातून काम सुद्धा केली. तेव्हा मागील वर्षभरात शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं काम कोणतं वाटतं? असा प्रश्न झी 24 तास आणि JDS या संस्थेनं महासर्व्हेच्या माध्यमातून विचारला. त्यावर नेमकं काय उत्तर आलं पाहा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला 5 डिसेंबर 2025 रोजी पहिले वर्ष पूर्ण होत असताना, झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी मतदान सर्व्हे करण्यात आला आहे. महायुती सरकारची गेल्या वर्षभराची कामगिरी कशी राहिली? कोणत्या योजना सामान्य लोकांच्या पसंतीला उतरल्या? सामान्य लोकांचं महायुती सरकारबाबत काय मत आहे? याचा कानोसा झी 24 तास आणि JDS या संस्थेनं एका महासर्व्हेच्या माध्यमातून घेतला आहे. यावेळी लाडकी बहीण संदर्भातही प्रश्न विचारण्यात आला.
शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं कोणतं काम वाटतं?
शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं कोणतं काम वाटतं? असा प्रश्न विचारून यासाठी जलयुक्त शिवार 2.0, मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा, पीक विमा, कृषी समृद्धी योजना अशा कामांचे पर्याय लोकांना देण्यात आले. यात लोकांनी शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांपैकी पीक विमाला सर्वात जास्त 38 टक्के मतं दिली. तर त्या खालोखाल 32 टक्के लोकांनी मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देणं हे सरकारने महत्वाचं काम केलं असं म्हटलं. त्यानंतर जलयुक्त शिवार 2.0 ला लोकांनी 18 टक्के आणि कृषी समृद्धी योजनाला 12 टाकेन लोकांनी मत दिलं. म्हणजे थोडक्यात गेल्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांपैकी पीक विमा हे सर्वात मोठं काम होतं असं लोकांचं मत आहे.

झी 24 तास आणि JDS चा महासर्व्हे
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 89 हजार 812 जणांना समाविष्ट करण्यात आलं. या सर्वेक्षणात, सामाजिक-राजकीय संशोधन व डेटा विश्लेषणातील दोन पद्धतींचा वापर करण्यात आला आहे.
पहिल्या पद्धतीत प्रत्यक्ष भेटी व घरघर फिरून सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके समाविष्ट होते. यादरम्यान 22 हजार 654 जणांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या.
तर दुसरा टेलिया मोबाईल-आधारित AI व्हॉइस सर्व्हे आहे. मोबाईलद्वारे अत्याधुनिक, संवादात्मक AI-आधारित व्हॉइस सर्व्हेमध्ये 67 हजार 158 जणांना समाविष्ट करण्यात आलं.
AI टेलिफोनिक व्हॉइस सर्व्हे आणि प्रत्यक्ष संवादामुळे महाराष्ट्रातील जनमताचा कानोसा घेणारे हे सर्वेक्षण आगळे वेगळे ठरले आहे.
महाराष्ट्रातील सर्व्हेची भौगोलिक व्याप्ती:
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या विविध विभागांचे संतुलित प्रतिनिधित्व मिळावे यासाठी खालील 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके येथे सर्व्हे करण्यात आला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



