digital products downloads

श्रीलंकेतील मठात केबल ट्रेन अपघात; वर्ध्यातील बौद्ध भिक्षूंसह 7 जणांचा मृत्यू

श्रीलंकेतील मठात केबल ट्रेन अपघात; वर्ध्यातील बौद्ध भिक्षूंसह 7 जणांचा मृत्यू

Cable Train Accident : श्रीलंकेत केबल कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघाता वर्ध्यातील भिक्षुंसह 7  जणांचा मृत्यू झाला आहे. यात वर्धेच्या बौद्ध भिक्षु ठकदरे गेल्या एक वर्षाच्या धम्म विनयच्या साधनेसाठी श्रीलंकेत होते. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतील मेलसिरीपुरातील पानसियागामा इथल्या ना उयाना मठ इथे हा भीषण अपघात झालाय. अपघाताच्या वेळी मठात 13 बौद्ध भिक्षू केबल कारमधून प्रवास करत होते, अशी माहिती मिळाली आहे. केबल कारची केबल तुटून पडल्याने किमान सात बौद्ध भिक्षूंचा जागीच मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री (24) कुरुनेगाला येथील बौद्ध वन मठात झालेल्या अपघातावेळी केबल कारमध्ये सुमारे 13 बौद्ध भिक्षू प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडला. 

अपघात मृत भिक्षुंपैकी किमान दोन परदेशी नागरिक असून महाराष्ट्रातील वर्ध्याचे बौद्ध भिक्षु वाकदरेंचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह गोकरेल्ला जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. ते वर्ध्याच्या तळेगांव मानव विकास साधना आश्रमचे आहेत. दरम्यान वर्ध्याच्या तळेगांव आणि परिसरातील नागरिकांनी प्रफुल्ल वाकदरे यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. मृतकांचे मृतदेह कुरुनेगाला शिक्षण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

FAQ

1. श्रीलंका केबल कार अपघात नेमके काय आहे?
श्रीलंका केबल कार अपघात हा 24 सप्टेंबर 2025 रोजी रात्री कुरुनेगाला जिल्ह्यातील मेलसिरीपुरा येथील पानसियागामा येथील ना उयाना मठ (ना लियाना अरण्य सेनानाया) जवळ घडला. केबल कारची केबल तुटून पडल्याने अपघात झाला, ज्यात 13 बौद्ध भिक्षू होते.

2. अपघातात किती भिक्षूंचा मृत्यू झाला?
अपघातात किमान 7 बौद्ध भिक्षूंचा मृत्यू झाला. कुरुनेगाला रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, केबल कारमध्ये 13 भिक्षू होते, आणि केबल तुटून खाली पडल्याने हा अपघात झाला.

3. अपघात कुठे घडला?
अपघात कुरुनेगाला जिल्ह्यातील मेलसिरीपुरा येथील पानसियागामा येथील ना उयाना मठ (ना लियाना अरण्य सेनानाया) जवळ घडला. हे बौद्ध वन मठ आहे, जिथे भिक्षू धम्म विनय साधना करत होते.

4. मृत भिक्षूंमध्ये महाराष्ट्रातील भिक्षू कोण आहे?
मृत भिक्षूंमध्ये महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील तळेगाव मानव विकास साधना आश्रमचे बौद्ध भिक्षू प्रफुल्ल वाकदरे (ठकदरे) यांचा समावेश आहे. ते एक वर्षाच्या धम्म विनय साधनेसाठी श्रीलंकेत गेले होते.

5. मृत्यू झालेल्या भिक्षूंमध्ये परदेशी नागरिक कोण आहेत?
मृत भिक्षूंमध्ये किमान 2 परदेशी नागरिक आहेत. प्रफुल्ल वाकदरे हे महाराष्ट्रातील आहेत, आणि इतर एका भिक्षूचा देखील परदेशी असल्याचा उल्लेख आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp