digital products downloads

संदीप क्षीरसागरांनी घेतली अजित पवारांची गुप्त भेट?: उपमुख्यमंत्री म्हणाले – पाणीप्रश्नासाठी तो मला भेटला, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही – Maharashtra News

संदीप क्षीरसागरांनी घेतली अजित पवारांची गुप्त भेट?:  उपमुख्यमंत्री म्हणाले – पाणीप्रश्नासाठी तो मला भेटला, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही – Maharashtra News


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज अजित पवार यांची गुप्त भेट घेतल्याचे समोर आले होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता खुद्द अजित पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देत चर्चांवर स

.

संदीप क्षीरसागर हे अजित पवारांच्या भेटीसाठी थेट पुण्यातील जुन्नर येथे पोहोचले होते. दोघांमध्ये बंददाराड चर्चा झाली. एकीकडे राज्याच्या राजकारणात शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत. त्यात आता शरद पवार गटाचे संदीक्ष क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेटी घेतली. या भेटीमागचे मागचे नेमके कारण काय? असा प्रश्ना सर्वांना पडला होता. मात्र आता अजित पवार यांनीच या भेटीमागचे कारण सांगितले आहे.

काय म्हणाले अजित पवार? या भेटीबाबत अजित पवारांना विचारले असता, ते म्हणाले. मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. बीड सारख्या शहरात 21 दिवस झाले पिण्याचे पाणी नाही. म्हणून तो मला शोधत इथे आला. विरोधी पक्षाचा आमदार मला भेटला म्हणून कोणत्याही ब्रेकिंग न्यूज चालवू नका. लोकप्रतिनिधी असल्यामुळे भेटने गैर नाही, असेही ते म्हणाले.

कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही चंद्रकांत दादा पाटील हे ज्यावेळी पुण्याचे पालकमंत्री होते, त्यावेळी मी देखील त्यांना भेटायला जात होतो असे अजित पवारांनी सांगितले. बीड सारख्या एवढ्या मोठ्या शहराला 21 दिवसानंतर पाणी जात आणि तातडीची गरज म्हणून ते मला भेटायला आले होते. यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे यामधून दुसरा काही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते. तसेच त्यांच्याबरोबर माझी दुसरी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

भेटीवर काय म्हणाले संदीप क्षीरसागर ? दरम्यान, या भेटीवर संदीप क्षीरसागर यांनीही प्रतिक्रिया दिली. अजितदादा आमचे पालकमंत्री आहेत. आमच्या बीड नगरपालिकेचा पाणी प्रश्न फार गंभीर आहे. बीडची लोकसंख्या 3 लाख आहे. 25 एमएलटीची नवीन एक योजना तयार आहे. पण एमएसईबीची थकबाकी न भरल्याने ती योजना रखडली मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही बीड शहराला 15 ते 20 दिवसांनी पाणी मिळत आहे. ही अडचण मी अजित पवार यांना सांगितली आहे. तसेच या भेटीची कोणतीही गुप्तता पाळलेली नव्हती, असे स्पष्टीकरण संदीप क्षीरसागर यांनी दिले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp