
आंबेडकरी चळवळ पुन्हा सत्तेत येण्यास आणखी २० वर्षे लागणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘वार्तालाप’ कार्यक्रमात ते म्हणाले की, लवकरच आणखी एका युद्धाची शक्यता लष्करा
.
आंबेडकर म्हणाले की, आज भारताकडे जगाची अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जाते. अशा वेळी पाकिस्तानला पुढे करून आपल्यासोबत छुपे युद्ध सुरू आहे. त्यामुळे यापुढच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीचे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता आहे.
हे हल्ले परतवून लावण्यासाठी आणि निर्माण झालेले भीतीचे वातावरण संपवण्यासाठी नवीन नेतृत्व तयार करण्याची वेळ आली आहे. सध्या निर्माण होत असलेल्या असंतोषाच्या वातावरणात कोणत्याही राज्यातील मुख्यमंत्री असो अथवा पंतप्रधान, त्यांच्यात कारवाई करण्याची हिंमत नाही. नवीन नेतृत्व तयार होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुन्या नेतृत्वांना आपल्या गुन्ह्यांची कबुली देणे गरजेचे वाटत नाही. अशा वेळी जुन्या नेत्यांनी तातडीने आपल्या गुन्ह्यांची कबुली द्यावी, तरच नवीन नेतृत्व तयार होणार आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान तीस दिवस जेलमध्ये राहिल्यास पद रद्द करण्याच्या कायद्याची गरज नाही, असेही मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा पातळीवर युतीचे अधिकार दिले
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने युती किंवा आघाडी करण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर देण्यात आले आहेत. तर आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती केली असली तरी आगामी काळात शिंदे हे शिल्लक राहतील का, हाच खरा प्रश्न आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.