digital products downloads

सरकारचे पॅकेज ही निव्वळ धूळफेक: संजय राऊत यांची टीका; सुप्रीम कोर्टातील लढाई ही शिवसेना विरुद्ध अमित शहांचा असल्याचाही दावा – Mumbai News

सरकारचे पॅकेज ही निव्वळ धूळफेक:  संजय राऊत यांची टीका; सुप्रीम कोर्टातील लढाई ही शिवसेना विरुद्ध अमित शहांचा असल्याचाही दावा – Mumbai News


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज हे निव्वळ धूळफेक असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीत दातावर मारा

.

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी महायुती सरकारने जाहीर केलेले पॅकेज, नवी मुंबई विमानतळाचे नामांतर, शिवसेना खटला आदी विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित केले. पंतप्रधानांचा भार हलका करण्यासाठी त्यांनी हे काम केले. पंतप्रधानांनी याहून मोठे पॅकेज घोषित करण्यास काहीच अडचण नव्हती. फडणवीसांनी 31 हजार कोटींचे पॅकेज घोषित केले आहे. मला त्यांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे की, या सरकारवर 9 लाख कोटींचे कर्ज आहे. या 31 हजार कोटींची उभारणी तुम्ही कशी करणार? शेतकऱ्यांना हा लाभ कसा मिळणार? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.

पॅकेजच्या अंमलबजावणीवर लोक साशंक

पंतप्रधानांनी ही घोषणा केली असती, तर हे पैसे केंद्राकडून आले असते. हे 31 हजार कोटी किंवा 35 हजार कोटी किंवा 50 हजार कोटी ही जबाबदारी केंद्राची होती. महाराष्ट्राच्या तिजोरीत दातावर मारायला पैसा नाही. कवडी नाही आणि तुम्ही 31 हजार कोटींची घोषणा केली. या पैशांची उभारणी कुठून करणार? तुम्ही मुख्य मागणी असलेल्या कर्जमाफीवर काही बोलला नाहीत. इतर घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल किंवा नाही याविषयी लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. 11 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वात मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन संभाजीनगरला होत आहे. कारण, फडणवीसांचे पॅकेज ही धूळफेक आहे. पंतप्रधानांपुढे कुणी मागणी करू नये. त्यांना कुणी काळे झेंडे दाखवू नये. त्यांच्या गाड्यांचा ताफा कुणी रोखू नये, यासाठी केलेली ही फक्त धूळफेक आहे, असे संजय राऊत म्हणाले.

आमचा न्यायदेवतेवर विश्वास

संजय राऊत यांनी शिवसेना प्रकरणावर सुप्रीम कोर्टात होणाऱ्या आजच्या सुनावणीवर भाष्य करताना आपला न्यायदेवतेवर विश्वास असल्याचेही नमूद केले. ते म्हणाले, शिवसेनेचा खटला आज 16 व्या क्रमांकावर आहे. आज अमित शहा कुठे आहेत हे आम्हाला पहावे लागेल. हा खटला शिवसेना विरुद्ध असा आहे. त्यामुळे अमित शहा नेमकी कोणती यंत्रणा याक्षणी वापरत आहेत, त्यावर आमचे लक्ष आहे. पण ज्या न्यायदेवतेवर आम्ही सातत्याने विश्वास ठेवला, तो विश्वास ढळेल अशी कृती न्यायदेवता आज करणार नाही अशी आशा आम्ही बाळगतो, असेही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

फडणवीसांना प्रगल्भ होण्याचा टोला

मुख्यमंत्री फडणवीसांनी आमचेच शब्द आमच्याविरोधात वापरू नये. मराठी शब्दकोश त्यांनी पुन्हा वाचायला घेतला पाहिजे. खूप शब्द आहेत. आमच्यावर टीका करण्यासाठी. तसे नसेल तर मराठी शब्दरत्नाकर नावाचा चांगला शब्द आहे. त्यांनी हा ग्रंथ साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रकाशित करावा. या ग्रंथात असंख्य लाखो चांगले शब्द आहेत. ते शब्द आमच्याविरोधात वापरता येतील. आमच्याच शब्दांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी हे करावे. मुख्यमंत्र्यांनी प्रगल्भ व्हावे अशी माझी त्यांना विनंती आहे. त्यांनी प्रगल्भतेचे दर्शन द्यावे. आपण भाजप नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक मोठा इतिहास निर्माण करण्याची संधी असताना, आपण अशी विधाने करत आहेत, असे राऊत म्हणालेत.

नवी मुंबई विमानतळाला दी.बा.पाटलांचे नाव देण्याचे स्वागत

नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मान्य झाला ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. शिवसेना ही भूमीपुत्रांच्या संघर्षातून निर्माण झालेली संघटना आहे. त्यामुळे भूमीपुत्रांचे नेते दी.बा. पाटील यांचे नाव, श्रमिकांच्या नेत्यांचे नाव त्या विमानतळाला देणे हा महाराष्ट्रातील भूमीपुत्रांचा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या लढ्याचा सन्मान आहे. दी. बा. पाटील यांच्या नावाला मंजुरी देण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने मान्य केला. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. त्यानंतर आमचे सरकार राहिले नाही. पण या कार्याला उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सरकारच्या फार मोठा हातभार लावला. याविषयी आम्हाला आनंद आहे. आम्ही या विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याचे स्वागत करतो.

भूमीपुत्रांच्या नावाने गरबा खेळू नका

आत्ता एवढीच मागणी आहे की, मुंबईचे मूळ विमानतळ, जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जाते, त्या विमानतळाची ओळख पुसली जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हे विमानतळ परिसरात व विमानतळावर आतापर्यंत शिवसेनेने भूमीपुत्रांना नोकऱ्या दिल्या. त्यामुळे तिकडे भूमीपूत्रांचा आवाज राहिला. नवी मुंबई विमानतळावर भूमीपुत्रांच्या नावाने गरबा खेळला जाऊ नये. तिथेही भूमीपुत्रांना व मराठी माणसांनाच नोकऱ्या मिळाव्यात. ही आमची मागणी कायम राहील. तसे झाले नाही तर मात्र संघर्ष होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp