digital products downloads

सरकारने गोड बोलून जनतेची मान कापली: मनोज जरांगे यांची अर्थसंकल्पावरून सरकारवर टीका; पुन्हा मुंबईला जाण्याचा इशारा – Chhatrapati Sambhajinagar News

सरकारने गोड बोलून जनतेची मान कापली:  मनोज जरांगे यांची अर्थसंकल्पावरून सरकारवर टीका; पुन्हा मुंबईला जाण्याचा इशारा – Chhatrapati Sambhajinagar News


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून महायुती सरकारवर टीका केली. सरकारचे आता भागले आहे. त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणींसाठी बजेटमध्ये काहीच दिले नाही. उलट बहिणींना अपात्रतेच्या नावाखाली

.

मनोज जरांगे यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मराठा आरक्षण, अर्थसंकल्प, मराठा आरक्षण आदी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, राज्याचा अर्थसंकल्प काल सादर झाला. त्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा होईल असे वाटले होते. पण सरकारने कोणतीही घोषणा किंवा तरतूद केली नाही. यामुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड झाला. सरकारचे आता भागले आहे. त्यामुळेच त्यांनी लाडक्या बहिणींसाठी बजेटमध्ये काहीच दिले नाही. उलट अपात्रतेच्या नावाखाली त्यांना योजनेतून वगळले जात आहे.

सरकारला अचानक आंदोलन करण्याचा इशारा

सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांनाही काही दिले नाही. कर्जमाफी नाही किंवा कर्जमुक्तीही नाही. त्यांनी गोरगरिबांच्या आरक्षणाचा प्रश्नही मार्गी काढला नाही. म्हणजे सरकारने केवळ गोड बोलून जनतेची मान कापली. त्यामुळे इथून पुढे कमी सांगायचे, कमी बोलायचे व अचानक आंदोलन करायचे या भूमिकेशिवाय सरकार आता ठिकाण्यावर येणार नाही. सरकारकडे जसा कावा आहे, तसा गरिबांकडेही आहे.

सरकारने फसवणूक केली

जरांगे पुढे म्हणाले, मी आरक्षणाची मागणी करत आहे म्हणून मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला जातीयवादी ठरवू नका. तुम्ही मागितले तेव्हा आम्ही तुम्हाला जातीयवाद म्हटले नाही. आमची केवळ गरिबांच्या लेकरांसाठी आरक्षणाची मागणी आहे. तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करत आहात, याचा अर्थ तुम्हीच जातीयवादी आहात. सरकारकडून आमची 100 टक्के फसवणूक केली आहे. आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचे होते. यासंबंधी ओबीसी कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज असेल तर त्याची अधिसूचना सरकारने काढली पाहिजे.

पुन्हा मुंबईला धडक देण्याचा इशारा

मनोज जरांगे यांनी यावेळी पुन्हा एकदा मुंबईला धडक देण्याचाही सरकारला इशारा दिला. आता खूप ऊन आहे नाहीतर त्यांना आताच हिचका दाखवला असता. मागच्या वेळी मुंबईला गेलो आणि सुखरूप परत आलो. नाहीतर त्यांना तेव्हाच झटका दाखवला असता. आम्ही काय मुंबईला येऊ नये का? आम्हालाही बघायचे आहे, मंत्री कुठे राहतो? आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना सुद्धा मुंबई बघू नाही का? त्यांनाही बघावी वाटते. आमचा मुंबईला जाण्याचा विचार थोडा थोडा चालू आहे. परंतु मी सध्या काही त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. माझ डाव सांगणार नाही, असे ते म्हणाले.

हे ही वाचा…

प्रार्थनास्थळांवरील भोंग्यावर होणार कारवाई:मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निर्गमित केल्या सूचना; आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कारवाई

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने प्रार्थनास्थळांवरील भोंग्यावर अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा दाखला देत रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगे बंद ठेवण्याची ताकीद दिली. तसेच या प्रकरणी आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसी कारवाई करण्याचाही इशारा दिला. यावेळी त्यांनी हे भोंगे बंद होतील, पण सकाळी 9 च्या भोंग्याचे काय करायचे? असा प्रश्न करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही टोला हाणला. त्यांचा हा सवाल ऐकताच सभागृहात हास्याचे कारंजे उडाले. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp