
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे करण्यात आलेल्या करारांवर संशय घेणाऱ्या विरोधकांवर चोख प्रत्युत्तर दिले. महायुती सरकार केवळ कागदी करार करत नाही. महाराष्ट्रात औद्योगिक करार लागू करण्याचा स्ट्राईक रेट तब्बल 80 ते 90 टक्के आहे, असे ते म्हणाल
.
विरोधकांनी दावोस दौऱ्यावर मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची उठवली होती. सरकारला महाराष्ट्रातील उद्योगपतींसोबत सामंजस्य करायचे होते, तर मुख्यमंत्री दावोसला कशासाठी गेले? यापूर्वीच्या औद्योगिक करारांचे काय झाले? किती गुंतवणूक झाली? किती रोजगार उपलब्ध झाले? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांनी या प्रकरणी सरकारवर केली होती. एवढेच नाहीतर त्यांनी या प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अॅडव्हॉन्टेज विदर्भ कार्यक्रमात बोलताना विरोधकांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
सरकार करार करते, त्याचा पाठपुरावाही करते
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकार केवळ कागदी करार करत नाही. करार केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करते. उद्योजकांशी सूसंवाद साधला जातो. त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे महाराष्ट्रात औद्योगिक करारांच्या अंमलबजावणी करण्याचा स्ट्राईक रेट तब्बल 80 ते 90 टक्क आहे. विशेषतः देशातील गुंतवणुकीची सरासरी 50 टक्के आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील गुंतवणुकीची सरासरी 80 ते 90 टक्के एवढी आहे.
मुख्यमंत्र्यांनी सादर केली करारांची आकडेवारी
मेक इन इंडिया अंतर्गत विदर्भात 274 एमओयू झाले होते. यापैकी 190 कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. 14 कंपन्यांचे काम प्रगतीपथावर आहे. 57 कंपन्यांनी मान्यतेसह सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. फक्त 5 कंपन्यांनी काहीच काम सुरू केले नाही. दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र मॅग्नेटिकमध्ये 138 कंपन्यांसोबत विदर्भात गुंतवणूक करण्याचे करार करण्यात आले होते. यापैकी 55 कंपन्यांनी उत्पादन सुरू केले, 19 कंपन्यांचे इन्फास्ट्रक्चरचे काम सुरू केले आहे. 49 कंपन्यांनी वेगवेगळ्या मान्यता प्राप्त केल्या आहेत. फक्त एका कंपनीने करारानुसार काम सुरू केले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हे ही वाचा…
महाराष्ट्रात 39 लाख ‘फ्लोटिंग’ मतदार:संजय राऊत यांचा मोठा आरोप; हे फिरते मतदार प्रथम बिहार, नंतर UP ला जाणार असल्याचा दावा
नवी दिल्ली – महाराष्ट्रात 39 लाख मतदार अचानक तयार झाले. हे फ्लोटिंग अर्थात फिरते मतदार असून, ते आता महाराष्ट्रानंतर प्रथम बिहार व नंतर उत्तर प्रदेशात जातील. निवडणूक जिंकण्याचा हा एक नवा पॅटर्न या देशात तयार झाला आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर
राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप:महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी तर 9.7 कोटी मतदार कसे?
नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या संदर्भात राहुल गांधी, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आम्हाला अनेक अनियमित आढळल्या असल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत देखील सरकारने बदलली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.