digital products downloads

सरकार वीज पुरवठ्याचे खासगीकरण करणार?: आंबेडकरांचा थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा; महावितरणला ‘पर्याय’ देण्याचे धोरण उधळवून लावणार – Mumbai News

सरकार वीज पुरवठ्याचे खासगीकरण करणार?:  आंबेडकरांचा थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा; महावितरणला ‘पर्याय’ देण्याचे धोरण उधळवून लावणार – Mumbai News


वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वीज पुरवठ्याच्या कथित खासगीकरणाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. खासगी कंपन्यांना वीज पुरवठा करण्याचा परवाना दिल्यास वंचित बहुजन आघाडी त्याविरोधात रस्त्यावर उतरणार, असे ते म्हणालेत. त्यांच्या या

.

प्रकाश आंबेडकर शनिवारी या प्रकरणी म्हणाले की, खासगी कंपन्यांना समांतर वीजपुरवठा परवाना दिल्यास वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरणार. राज्यात अदानी व टोरंट कंपनीकडून अनेक शहरांत वीज वितरणाच्या परवान्यासाठी अर्ज केलेत. खासगी कंपन्यांना वीजपुरवठा परवाना हा वीज मंडळाच्या खाजगीकरणाची सुरुवात असून सरकारने हे समांतर परवाने देऊ नये. अन्यथा या खाजगीकरण धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल.

राज्यात समांतर वीज परवाना, स्मार्ट मीटर योजना, 200 कोटींच्यावरील महापारेषणचे प्रकल्प टी.बी.सी.बी. पद्धतीने देण्याबाबतच्या धोरणांचे महावितरण व महापारेषण कंपनीचे खासगीकरण केले जात आहे. महावितरणनेही मुंबई शहरातील कुलाबा माहिम, बांद्रा, दहीसर अशा एकूण 13 क्षेत्रात वीज वितरणासाठी परवाना अर्ज दाखल केला आहे. याला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे.

विद्युत क्षेत्रातील विविध कामगार संघटनांचे एकत्रित संघटन असलेल्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रसिटी वर्कर्स फेडरेशनकडून महावितरणसह शासनाला राज्यव्यापी संपाचा इशारा देण्यात आला. त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा राहणार असून महावितरणच्या खासगीकरणाचे हे धोरण हाणून पाडण्यासाठी वर्कर्स फेडरेशनने महाराष्ट्रात आंदोलन करीत असल्यास त्याला पाठिंबा आणि कायदेशीर मदत करू. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यातही महावितरणला ‘पर्याय’ उभा करण्याचे सरकारी धोरण यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

संविधानातील बदलावरून केंद्रावर निशाणा

दुसरीकडे, प्रकाश आंबेडकरांनी संविधानाच्या प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष शब्द काढण्याच्या मुद्यावरून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही कडाडून हल्ला चढवला आहे. आरएसएस व भाजप 10 वर्षांहून अधिक काळापासून सत्तेत आहे. त्यांच्यात हिंमत असती तर त्यांनी ते यापूर्वीच केले असते. पण वंचित आणि बहुजनांच्या ताकदीमुळे या आरएसएस – भाजपला संविधानाशी छेडछाड करता येत नाही.

आरएसएस व भाजप निवडणुकीच्या तोंडावर अशी मूर्खासारखी विधाने करत असते. त्यांची काही शब्द वगळण्याची इच्छा आहे. पण आपल्या संविधानातील प्रत्येक कलम त्या शब्दांचा आदर्श अधोरेखित करते. संघ व भाजप त्याला कसे वगळणार? असा सवाल त्यांनी यासंबंधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधताना उपस्थित केला आहे.

हे ही वाचा…

एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला टोला:म्हणाले – ज्यांनी हिंदी सक्तीचा अध्यादेश स्वीकारला, तेच आता विरोधात मोर्चा काढत आहेत!

मुंबई – मराठीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे. या दोघांनीही या प्रकरणी 5 जुलै रोजी संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. ज्यांनी हिंदी सक्तीचा अध्यादेश स्वीकारला, तेच आता त्याविरोधात मोर्चा काढत आहेत, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp