
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाचा खरा अर्थ लोकशाही आणि गांधीवाद यात दडलेला होता, असे मत शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित ‘सरदार वल्लभभाई पटेल (चरित्र व काळ)’
.
डॉ. पवार म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५५० संस्थाने अस्तित्वात होती. या संस्थानांचे विलीनीकरण करताना सरदार पटेल यांनी अहिंसक मार्गाने लढा दिला. त्यांनी कोणत्याही संस्थानिकांवर गोळ्या चालवल्या नाहीत किंवा त्यांना हाकलून दिले नाही, तर गांधीजींच्या अहिंसेचे तत्त्व प्रत्यक्षात राबवले. राजेशाहीऐवजी त्यांनी देशात लोकशाही आणली आणि जबाबदार शासनपद्धती हे त्यांचे मुख्य शस्त्र होते.लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य असले तरी तो स्वैराचार नसून एक मोठी जबाबदारी असते, असे त्यांनी सांगितले. सरदार पटेल हे अत्यंत व्यवहारी होते. अनेक समस्यांवर सुवर्णमध्य काढण्यात त्यांची हातोटी होती. लोकशाहीची तत्त्वे त्यांच्यात खोलवर रुजलेली होती आणि ही तत्त्वे व्यवहारात यशस्वी करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेत आयोजित या परिसंवादात लेखक कै. मामासाहेब देवगिरीकर लिखित ‘सरदार वल्लभभाई पटेल (चरित्र व काळ)’ या पुस्तकावर चर्चा करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. एम. एस. जाधव, ॲड. अभय छाजेड, विश्वंभर चौधरी, ॲड. असीम सरोदे, लेखिका अंजली कुलकर्णी आणि अन्वर राजन उपस्थित होते.डॉ. पवार यांनी पुढे सांगितले की, सरदार पटेल हे आतून मऊ मेणाप्रमाणे असले तरी वेळप्रसंगी त्यांची ओळख ‘लोहपुरुष’ अशी होती. त्यांना स्वातंत्र्य, डावपेच, लष्करी बाबी आणि प्रशासन यांची उत्तम जाण होती. सरदार म्हणजे केवळ लष्कराचे प्रमुख नव्हते, तर त्यांच्यात विवेक, विश्वास आणि वैराग्य देखील होते. राष्ट्रासाठी त्यांनी वैराग्य पत्करले, जे मनातील बदलातून प्राप्त होते.राष्ट्रीय एकात्मतेबाबत ते आग्रही होते. संस्थाने रद्द करताना केंद्र प्रबळ आणि राज्य दुबळे अशी त्यांची भूमिका नव्हती, तर त्यांनी राज्यांनाही सक्षम बनवले. कोणत्याही गोष्टीत त्यांनी सातत्याने संवाद सुरू ठेवला, ज्यामुळे त्यांना यश मिळाले. त्यांनी केलेल्या तडजोडी गरजेनुसार आवश्यक होत्या, ज्यांचे महत्त्व विरोधकांना त्यावेळी उमगले नाही.ज्या तडजोडी करायच्या त्या लेखी आणि परिणामकारक असाव्यात, हे व्यवहार कौशल्य त्यांच्याकडे होते. आजच्या काळात तडजोड म्हणजे केवळ बदल दिसून येतो. ते धार्मिक आणि धर्मनिष्ठ होते, पण धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरणारे होते. धर्मनिरपेक्षतेबद्दल त्यांनी कधीही तडजोड केली नाही. अंधश्रद्धा आणि भाबडेपणा यांना त्यांनी कधीही थारा दिला नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



