digital products downloads

‘सांगू शकत नाही, रडूही शकत नाही’ मंत्रिपद न मिळाल्याचे राणा दाम्पत्याला शल्य; अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटचा उल्लेख करत म्हणाले…

‘सांगू शकत नाही, रडूही शकत नाही’ मंत्रिपद न मिळाल्याचे राणा दाम्पत्याला शल्य; अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटचा उल्लेख करत म्हणाले…

Navneet Rana and Ravi Rana : अमरावतीतील पवित्र हनुमान गढीवर राणा दांपत्याने दिवाळीच्या शुभ प्रसंगी भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले, ज्यात हजारो दिव्यांच्या ज्योतीने परिसर उजळून निघाला. या उत्सवात  आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसोबत दिवाळी साजरी करत त्यांना मार्गदर्शन केले. या उत्सवावेळी रवी राणा यांनी गुलाबी जॅकेट परिधान केले होते. त्या जॅकेटमागची कहाणीदेखील त्यांनी यावेळी सांगितली. तसेच राणा दाम्पत्याने शेरो शायरीतून नाराजीदेखील व्यक्त केली. त्यामुळे हा कार्यक्रम दिवाळी उत्सवासोबत राजकीय असंतोषाचे प्रतीक ठरला. काय घडलं? सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

रवी राणांनी सांगितली जॅकेटची कहाणी

रवी राणा यांनी दीपोत्सवात गुलाबी जॅकेट घालण्यामागील गोष्ट सांगितली. ‘मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मी अनेक जॅकेटे तयार करून ठेवली होती, कारण मला खात्री होती की मी मंत्री होणारच. पण ती जॅकेट्स आजही तसेच पडलेली आहेत. त्यामुळे मी ती दिवाळी-दसऱ्याला घालतो, असे ते म्हणाले. अजित पवारांनी गुलाबी जॅकेट घातले म्हणून नव्हे तर मंत्रीपदाच्या विश्वासाने मी तयारी केली होती’, असेही त्यांनी पुढे सांगितले. 

नवनीत राणांचा शायराना अंदाज

पतीच्या दुःखावर बोलताना नवनीत राणा यांनी शायरीचा आधार घेतला, ज्यात मंत्रिपद न मिळाल्याचे शल्य उघड केले. त्यांनी म्हटले, “समंदर को गम है, ना ही ओ बता सकता है, ना ही ओ रो सकता है – हीच आमची स्थिती आहे.असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. (समुद्रासारखा गंभीर दुःख, जो व्यक्त होऊ शकत नाही किंवा रडवू शकत नाही.) 

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रवी राणा यांना स्थान न मिळाल्याने हे दांपत्य निराश असल्याची चर्चा आहे. रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून चार वेळा विजयी झालेले नेते आहेत, तर नवनीत राणा अमरावतीतून खासदार म्हणून ओळखल्या जातात. या अपेक्षाभंगाने त्यांचा राजकीय विश्वास डावलला गेल्याचे दिसते. “माझा पराभव झाला तरी माझा झेंडा मजबूत आहे, असे राणा सांगतात.

FAQ

अमरावतीतील हनुमान गढीवरील दीपोत्सवाचे वैशिष्ट्य काय होते?

अमरावतीच्या हनुमान गढीवर राणा दांपत्याने (रवी राणा आणि नवनीत राणा) दिवाळीच्या निमित्ताने भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले. या कार्यक्रमात हजारो दिव्यांनी परिसर उजळला गेला. रवी राणा यांनी गुलाबी जॅकेट परिधान करून सहभाग घेतला, तर नवनीत राणा यांनी मंत्रिपद न मिळाल्याच्या दुःखाला शायरीद्वारे व्यक्त केले. हा उत्सव धार्मिकतेसोबतच राजकीय असंतोष व्यक्त करण्याचा मंच ठरला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली.

रवी राणा यांनी जॅकेटबाबत काय सांगितले आणि त्यामागील संदर्भ काय आहे?

रवी राणा यांनी सांगितले की, त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी मंत्रिपदाच्या अपेक्षेने अनेक जॅकेटे शिवली होती, पण ती तशीच पडून राहिली. ते म्हणाले, “मी गुलाबी जॅकेट अजित पवारांमुळे नाही, तर मंत्रिपदाच्या विश्वासाने शिवले होते. आता ती दसरा-दिवाळीला घालतो.” यामागे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान न मिळाल्याची निराशा आहे, ज्यामुळे त्यांनी आपले शल्य हलक्या-फुलक्या पद्धतीने व्यक्त केले.

नवनीत राणा यांनी शायरीद्वारे काय व्यक्त केले?

नवनीत राणा यांनी रवी राणा यांना मंत्रिपद न मिळाल्याच्या दुःखाला शायरीतून व्यक्त केले: “समंदर को गम है, ना ही ओ बता सकता है, ना ही ओ रो सकता है – हीच आमची स्थिती आहे.” याचा अर्थ, त्यांचे दुःख समुद्रासारखे गहन आहे, जे व्यक्त किंवा रडूनही काढता येत नाही. त्या पुढे म्हणाल्या, “रवी यांनी जॅकेटे शिवली, पण शपथ घेऊ शकले नाहीत. तरीही माझा पराभव झाला तरी माझा झेंडा मजबूत आहे.” ही शायरी त्यांच्या राजकीय दृढनिश्चयाचे आणि निराशेचे प्रतीक आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp