digital products downloads

सावधान! राज्यात पुढील चार दिवसांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट

सावधान! राज्यात पुढील चार दिवसांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात शनिवारपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source

शनिवारी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रत्नागिरी भागात रविवारी मुसळधार पावसाचा तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय काही भागात कमी वेळात जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मुंबईतील परिस्थिती काय? 

शनिवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण होते. कुलाबा हवामान केंद्रात 29 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात 29.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर तापमानात वाढ झाली होती आणि नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र शनिवारी सकाळपासून दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि नवी मुंबई परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. रात्रीच्या सुमारास काही भागात मुसळधार पाऊस पडला.

हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना अलर्ट 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीमध्ये मुसळधार तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचू शकते आणि वाहतुकीस अडथळे येण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने सुरक्षित स्थळी राहण्याचा आणि गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. 

FAQ

1. महाराष्ट्रात पावसाचा इशारा कशामुळे दिला गेला आहे?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शनिवारपासून (13 सप्टेंबर 2025) पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून, पुढील 4-5 दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

2. मुंबईत शनिवारी पावसाची स्थिती काय होती?

शनिवारी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण होते. सकाळपासून दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस झाला. रात्री काही भागात मुसळधार पाऊस पडला. कमाल तापमान कुलाबा येथे 29°C आणि सांताक्रूझ येथे 29.7°C नोंदवले गेले.

3. रविवारी (14 सप्टेंबर) मुंबई आणि आसपासच्या भागात काय अपेक्षित आहे?

मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीत मुसळधार पावसाचा तर रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. काही भागात कमी वेळात जास्त पावसाची शक्यता असून, पाणी साचण्याची भीती आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp