
राज्यात बहुतांश शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. या काळात मुले आपल्या गावी जातात. असाच मुंबईहून एक चिमुकला त्याच्या गावी रत्नागिरीला गेला होता. मात्र त्याच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली. आपल्या नातेवाईकांबरोबर गावी आलेल्या सहा वर्षीय चिमुक
.
रत्नागिरी जवळ धामणसे येथील सोमगंगा नदीच्या डोहात बुडून देवांश श्रावण मोरे याचा मृत्यू झाला आहे. देवांशचे वय केवळ 6 वर्षे होते. मुंबई येथील जोगेश्वरी येथे तो राहत होता. शाळेला सुट्टी लागल्याने आपल्या नातेवाईकांसोबत देवांश त्याच्या गावी आला होता. मात्र, त्याच्यावर काळाचा घाला झाला आणि कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले.
अधिकची माहिती अशी की, देवांश हा मुंबईहून 9 एप्रिल रोजी कोकणात गावी सत्यनारायणाची पूजा आणि पालखीसाठी आला होता. शुक्रवारी 11 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास देवांश नातेवाईक आणि वाडीतील इतर मुलांसोबत धामणसे जोशी वाडी येथील सोमगंगा नदीवरील डोह येथे आंघोळीसाठी गेला होता. याच दरम्यान देवांश पाण्यात बुडाला. त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले व जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथे त्याची डॉक्टरांनी तपासणी केली व रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासून देवांशला मृत घोषित केले.
शुक्रवारी सायंकाळी 4.30 च्या वाजता रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी देवांशला मृत घोषित केले. या घटनेमुळे मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएसएस) 194 नुसार आकस्मिक मृत्यू क्रमांक 26/2025 म्हणून करण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.