digital products downloads

सुनील तटकरे आमदार थोरवेंविरोधात आक्रमक: 65 कोटींचा मानहानीचा केला दावा, मंगेश काळोखे हत्याकांडावरून केले होते आरोप – Mumbai News

सुनील तटकरे आमदार थोरवेंविरोधात आक्रमक:  65 कोटींचा मानहानीचा केला दावा, मंगेश काळोखे हत्याकांडावरून केले होते आरोप – Mumbai News



राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना शिंदे गट कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात तब्बल 65 कोटी 3 हजार रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. आमदार थोरवे यांनी केलेल्या गंभीर आणि निराधार आरोपांमुळे आपली राजकीय तसेच सामाजिक प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत तटकरेंनी हे कायदेशीर पाऊल उचलले आहे. या प्रकरणाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण वाद खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंगेश काळोखे हत्याकांडाशी निगडित आहे. २७ डिसेंबर २०२५ रोजी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार तटकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला होता. रायगड जिल्ह्यात ‘रक्तरंजित राजकारण’ सुरू असून तटकरे हे जिल्ह्याचे ‘आका’ असल्यासारखे वागत आहेत, असा आरोप थोरवेंनी केला होता. तसेच, काळोखे यांच्या हत्येमागे तटकरे यांचाच हात असून ही घटना पूर्वनियोजित होती, असाही आरोप त्यांनी केला होता. आमदार महेंद्र थोरवेंनी केलेल्या आरोपांनंतर खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्याविरोधात माणगाव येथील दिवाणी न्यायालयात मानहाणी खटला दाखल केला आहे. या प्रक्रियेसाठी तटकरे यांनी सुमारे ३ लाख रुपयांचे न्यायालयीन शुल्क भरले आहे. प्रतिमा डागाळल्याचा तटकरेंचा दावा या आरोपांमुळे आपली तीन दशकांची राजकीय कारकीर्द आणि सार्वजनिक जीवनातील स्वच्छ प्रतिमा डागाळली गेल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे. “थोरवे यांनी केलेले आरोप केवळ खोटेच नाहीत, तर ते राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहेत. या विधानांमुळे समाजात माझ्याबद्दल चुकीचा आणि दहशत निर्माण करणारा संदेश जात आहे,” असे तटकरे यांनी नमूद केले. सुनील तटकरेंच्या मागण्या काय‌? आमदार थोरवे यांनी केलेले आरोप मानहानीकारक असल्याचे जाहीर करावे. बदनामी करणारे सर्व व्हिडिओ आणि मजकूर सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटवण्यात यावेत. भविष्यात अशा प्रकारची कोणतीही निराधार विधाने करण्यास थोरवे यांना मनाई करावी. झालेल्या मानसिक आणि सामाजिक हानीबद्दल ६५ कोटी ३ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. महायुतीत संघर्षाची ठिणगी? राज्यात शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असताना, रायगडमध्ये मात्र या दोन बड्या नेत्यांमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. या न्यायालयीन लढाईमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp