
भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात भेट झाली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आमच्या तिघांमध्ये साडे चार तास भेट झाल्याचे सांगितले आहे. यावरून आता ठाकरे गट
.
सुषमा अंधारे म्हणाल्या, सुरेश धस बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहेत. मला संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे वाईट वाटते ज्यांनी सुरेश धस यांच्यावर एवढा विश्वास टाकला. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन बीडच्या जनतेचा विश्वास गमावला. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कधी ते पोलिसांना माफ करा म्हणतात, कधी ते धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात. ही संभ्रमावस्था ते का निर्माण करतात? ते फक्त स्वतःचा विश्वास गमवत नाहीत तर ते देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हता सुद्धा गमवत आहेत.
पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, सुरेश धस यांनी जो लढा उभा केला होता तो फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिथे राष्ट्रवादी आहे तिथे भाजपचा शिरकाव करण्यासाठीच होता. धस यांची मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणे आणि देवेंद्र फडणवीस यांची इमेज बाहुबली प्रस्तावित करणे एवढेच काम त्यांना करायचे होते. ते काम फत्ते झाल्यानंतर आता एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्यानंतर काय फरक पडतो असे त्यांना वाटत असेल.
तसेच राज्यातील 18 पगड जातीने सुरेश धस यांच्यावर विश्वास दाखवला, तो विश्वास त्यांनी मातीमोल ठरवला. त्यामुळेच गंगाधरही शक्तिमान है, असे आम्हाला खेदाने म्हणावे लागत आहे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. दरम्यान, सुरेश धस यांनी ही भेट तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.