
शासनाने अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीमधून सेनगाव हिंगोली तालुका वगळल्यानंतर शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला तीव्र संताप तसेच भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर शुक्रवारी ता. 10 या दोन्ही तालुक्यांचा वाढीव मदतीच्या यादीम
.
हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत 2 लाख 71 हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. महसूल प्रशासनाने या ठिकाणी पंचनामे करून शासनाकडे अहवाल देखील सादर केला त्यानंतर शासनाने 231 कोटी रुपयांचा निधी हिंगोली जिल्ह्यात दिला आहे.
त्यानंतर सप्टेंबर महिन्यातही झालेल्या अतिवृष्टीमुळे उरलेसुरले पिक नष्ट झाले. जिल्ह्याचे प्रमुख पीक समजले जाणारे कापूस, सोयाबीन, हळद या पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. मात्र त्यानंतरही शासनाने गुरुवारी तारीख 9 राज्यातील 253 तालुक्यांचा अतिवृष्टीच्या वाढीव मदतीसाठी शासन निर्णय जारी केला. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैकी सेनगाव व हिंगोली तालुक्याला वगळण्यात आले होते.
या प्रकारानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह ठाकरे गटाने तीव्र असंतोष व्यक्त करून आंदोलन सुरू केले. तर दुसरीकडे भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून हिंगोली व सेनगाव तालुक्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. या तालुक्यांमध्ये ही अतिवृष्टीमुळे पिकांची नुकसान झाले असून या तालुक्याचा वाढीव मदतीसाठी समावेश करावा अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आमदार मुटकुळे यांनी आज सकाळी समाज माध्यमावर व्हिडिओ प्रसिद्ध करून दोन्ही तालुक्याचा शासन निर्णय काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी शासन निर्णय येईपर्यंत संयम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
त्यानंतर आज दुपारी नव्याने शासन निर्णय जारी करण्यात आला असून यामध्ये हिंगोली व सेनगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.