
सौगात-ए-मोदीमुळे अनेकांची गोची झाली आहे. भाजपमधील काही लोकांना देशातील मुस्लिमांचे अस्तित्व मान्य नाही. त्यांना असे वाटते की मुस्लिमांनी या देशात राहूच नाही. मुस्लिम क्षत्रू आहेत त्यांना काही अधिकार नाही, असे वाटणाऱ्या लोकांनी मोदीकी सौगातचे स्वागत क
.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, देशातील गरीब मुस्लिमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो हात पुढे केलास आहे ती सरकारची मदत आहे. आम्ही त्यावर टीका करणार नाही. पण कालपर्यंत जे ह्यावर टीका करत होते त्यांची यावर प्रतिक्रिया का आली नाही?
बाडग्या हिंदुंना मोदी इफ्तारला पाठवतील
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान दिल्लीमध्ये हे जे बाडगे हिंदू आहेत, जे आमच्याकडूनच तिकडे गेले आहे, त्यांची ह्या निर्णयामुळे फार गोची झाली आहे. मोदी त्यांना आता इफ्तार पार्टीमध्येसुद्धा पाठवतील, अन् त्यांना जावे लागेल.
प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न
संजय राऊत म्हणाले की, मुस्लिम समाज आपल्या सोबत आला नाही तर 2029 ची लोकसभा निवडणूक आणि त्यापूर्वी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मतदान होणार नाही याची खात्री पटल्याने ते असे निर्णय घेत आहेत. ते मुस्लिम राष्ट्रांना दाखवत आहे की, आमच्याकडील मुस्लिमांची आम्ही काळजी घेतो हे दाखवण्याचा प्रयत्न करत स्वत:ची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
राजकारणात टीकेला मजा म्हणून पहावे लागते
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे काय म्हणतात यावर देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरू शकत नाही. आपण गद्दारी केल्यापासून जी वक्तव्य करत आहात ती कोणत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसतात. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोकं गेली 3 वर्षे जी भाषा वापरत आहे, ती कोणत्या शब्दकोशात बसते हे सांगावे. कुणाल गेली अनेक वर्षे असे कार्यक्रम करतो, त्यांने राहुल गांधी पासून तर उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांवर असे टीका केली आहे. केवळ महायुतीच्या नेत्यावर अशी टीका केलेली नाही, पण हे सोडून द्यावे लागत असते.
तेव्हा तुम्ही सुपाऱ्या दिल्या का?
संजय राऊत म्हणाले की, आपली बदनामी होणार नाही तोपर्यंत राजकारणी लोकांनी टीकेकडे एक मजा म्हणून पाहिले पाहिजे. गेल्या 60 ते 70 वर्षांपासून आम्ही हे अशी टीका पाहत आहोत. आमच्या लोकांवर जेव्हा अशी टीका झाली तेव्हा त्या सुपाऱ्या तुम्ही दिल्या का?.
शिंदेंच्या अवतीभोवती डोकी नाहीत मडकी
संजय राऊत म्हणाले की, मुंबईला पाकिस्तान म्हटले तर ते चालेल का, हा भारत देश आहे कोणत्याही भागाला पाकिस्तान, बांगलादेश म्हणू शकत नाही. व्यंगचित्र काय होते हे पाहून या असे संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या अवतीभोवती डोकी नाहीत मडकी आहेत. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचे काम भाजपने केले आहे. त्याचे शिरोमणी मिस्टर अमित शहा आहेत. वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्याबाबत राज्य सरकारने आपले मत व्यक्त करावे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.