
Parenting Tips: पालकांचा आपल्या मुलांवर खूप जीव असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पालक सतत आपल्या मुलांची काळजी करत असतात. मुलांनी चांगलं शिकाव, त्यांचं चांगलं करिअर व्हावं असं पालकांना वाटत असत. पण वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आल्यावर मुलं पालकांप्रती आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त करतात. एक किंवा जास्त मुलं असतील तेव्हा आपल्याशी भेदभाव होतोय, असे त्यातील एकाला वाटत राहते. पालक माझ्याशी भेदभाव करतात किंवा माझ्या भावंडांचे वर्तन माझ्यापेक्षा असे मुलांना वाटते. अशावेळी तुम्ही थेरपिस्टचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. ते काय सांगतात हे समजून घेतले पाहिजे. यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी स्पष्टपणे समजण्यास मदत होईल.
‘दोन मुलांशी अगदी सारखेच वागणे हे केवळ एका यंत्रासाठी शक्य’
मुलांनी नेहमी खरं बोलावं ही शिकवणं आपल्याला पालकांकडून मिळते. पण हजारो वर्षांपासून पालकच आपल्या मुलांशी एक खोटं सातत्याने बोलत आलेयत हे तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे सत्य आहे. आम्ही सर्व मुलांवर समान प्रेम करतो आणि सर्वांना समान वागणूक देतो, असे सर्व पालक म्हणतात. पण हे खरोखर खरे आहे का? की वास्तव काही वेगळे आहे? दोन मुलांशी अगदी सारखेच वागणे हे केवळ एका यंत्रासाठी शक्य आहे, माणसासाठी नाही, असे थेरपिस्ट रिरी त्रिवेदी सांगतात. थेरपिस्टने राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये त्या बोलत होत्या. ज्याचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर आहे. थेरपिस्टने या विषयावर आणखी काय म्हटलंय? सविस्तर जाणून घेऊया.
एक मूल कुटुंबात एक विशेष “स्थान” घेते. उदाहरणार्थ तो एकतर यशस्वी होतो.जो अभ्यासात चांगला असतो. स्वावलंबी असतो आणि नेहमीच चांगला वागणारा मानला जातो. तो असा मुलगा मानला जातो जो सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतो, असे अनेकदा घडत असल्याचे रिरी त्रिवेदी सांगतात.
दुसरे मूल पहिल्या मुलाचे स्थान घेऊ शकत नाही
जेव्हा एक मूल एका विशिष्ट दिशेने पुढे जाते किंवा एक विशेष ओळख निर्माण करते तेव्हा बहुतेकदा दुसरे मूल पहिल्या मुलाचे स्थान घेऊ शकत नाही. म्हणून तो पूर्णपणे वेगळा मार्ग निवडतो. तो मोठ्या मुलाच्या अगदी उलट वागू लागतो. याला ‘ध्रुवीयता’ म्हणतात. जिथे एक मूल एका क्षेत्रात पुढे जाते आणि दुसरे मूल दुसऱ्या दिशेने स्वतःला घडवते, असे थेरपिस्ट रिरी यांनी स्पष्ट केले.
पालक स्वतः देखील काळानुसार बदलतात
आम्ही दोन्ही मुलांना समान वातावरण आणि संगोपन दिलंय, असे पालक अनेकदा म्हणतात. पण पालक स्वतः देखील काळानुसार बदलतात हे ते विसरतात. म्हणून दोघांनाही समान वागणूक मिळालीय असे म्हणणे पूर्णपणे बरोबर नसल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक मुलासाठी पालकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या
जेव्हा पालकांच्या समान वागणुकीचा प्रश्न येतो तेव्हा पालक फक्त समान अन्न किंवा इतर सुविधा देऊ शकतात. पण दोन्ही मुलांना समान वागणूक देऊ शकत नाहीत. कारण प्रत्येक मुलासाठी पालकांच्या प्रतिक्रिया कुठेतरी वेगळ्या असतात आणि प्रत्येक मुलामध्ये त्यांच्यात काही वेगळ्या गोष्टी निर्माण होतात, असेही त्यांनी पुढे सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.