
येथील पाटचारीद्वारे शेतीला पाणी मिळावे यासाठी नामपूरसह परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. पाटबंधारे विभागाच्या आडमुठे धोरणामुळे व पाऊस लांबल्याने मका पिकास पाणी देण्यास उशीर होत आहे. यामुळे विहिरींची पातळी कमी होण्याची भिती आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा
.
बंधारे तुटल्याने लगतच्या शेतात पाणी जात असल्याने फळ्या टाकण्यास विरोध दर्शवला होता. नादुरुस्त बंधाऱ्याच्या नूतनीकरणाचा विसर पाटबंधारे विभागास पडला आहे. यावर्षी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाल्याने मोसम नदीला सोडण्यात आलेले पूरपाणी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कालव्यांना सोडण्यात पाटबंधारे विभागाने असमर्थता दर्शवल्याने मोसम खोऱ्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. नामपूर येथील बंधाऱ्यावर फळ्या टाकल्यास बंधाऱ्याला धोका पोहोचण्याचा युक्तिवाद अधिकाऱ्यांनी केला आहे.
सद्यस्थितीत करंजाडी, मोसम, काटवण खोऱ्यातील सर्वच गावांना पाण्याची प्रतीक्षा आहे. तळवाडे भामेर येथील तलावास पाण्याची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांना निवेदन देत कालव्यांना पूरपाणी सोडण्याबाबतचे निवेदन दिले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.