
जिल्ह्यातील शाळांमधून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप का झाले नाही, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा का केला असा सवाल करीत त्यांना तातडीने नोटीस देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी मंगळवारी ता. 17 शिक
.
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर, संदीप सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अंजली रमेश यांनी शिक्षण विभागाच्या कामाचा आढावा घेतला. शाळेच्या पहिल्या दिवशी किती विद्यार्थी हजर होते, कोणत्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी होती याची माहिती घेऊन कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना भेटी देऊन अडचणी जाणून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी बहुतांश ठिकाणी गणवेश वाटप झाले नसल्याचे लक्षात येताच त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गणवेश का वाटप झाले नाही असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले. गणवेश वाटपात निष्काळजीपणा केल्याच्या कारणावरून गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील सर्वच शाळांमधून निपुण महाराष्ट्र अंतर्गत विविध उपक्रम राबवून गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावे. त्यासाठी तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शाळांना भेटी देऊन तपासणी करावी. शाळेत विद्यार्थीनी 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी गैरहजर असलेल तर त्या विद्यार्थीनीच्या घरी भेट देऊन त्याची अडचण जाणून घेत त्याची सोडवणूक करावी. शाळेत सर्वच विद्यार्थी नियमितपणे उपस्थितत राहतील याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत त्यांच्या पालकांनाही माहिती देण्यासाठी शिक्षक, पालक मेळावे घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.