
हिंगोली जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी ११ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून सर्वात जास्त १२७ मिलीमीटर पाऊस हयातनगर व वसमत मंडळात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १४१ टक्के पाऊस झाला आहे.
.
हिगोली जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून धुवाधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून वसमत, कळमनुरी तालुक्यात अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना मोठा फाटका बसला आहे. कळमनुरी तालुक्यात २५ कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले होते. तर वसमत शहर व कुरुंदा भागातील काही जणांना स्थलांतरीत करण्यात आले होते.
दरम्यान, मागील चोविस तासात जिल्हयातील ३० मंडळांपैकी ११ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने वसमत, हयातनगर मंडळात प्रत्येकी १२७ मिलीमीटर, कळमनुरी ७०.३ मिलीमीटर, आखाडा बाळापूर १०३ मिलीमीटर, वाकोडी ७०.३ मिलीमीटर, डोंगरकडा १०८ .८ मिलीमीटर, आंबा ९६.५ मिलीमीटर, गिरगाव ६५.३ मिलीमीटर, टेंभूर्णी ७८.८ तर कुरुंदा मंडळात ८८.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात जून महिन्यापासून आता पर्यंत वार्षिक सरासरीच्या १४१ टक्के पाऊस झाला आहे. हिंगोली तालुक्यात ९८९ मिलीमीटर, कळमनुरी १२४४, वसमत १२०३, औंढा नागनाथ ११९१ तर सेनगाव तालुक्यात ८९६ मिलीमीटर पाऊस झाला झाला आहे यापुर्वी हिंगोली जिल्ह्यात सन २००६ मध्ये जोरदार पाऊस झाला होता. यावर्षी झालेल्या पावसाने १९ वर्षापूर्वीच्या अतिवृष्टीची आठवण झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



