
हिंगोली जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तब्बल 1577 हेक्टर क्षेत्राच्या केळी व पपई पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 5.77 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्या
.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालु्क्यात केळीचे पिक घेतले जाते. यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून केळीचे पिक काढणीसाठी आले असतांनाच ता. 9 जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागाच उध्वस्त झाल्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बुद्रूक, डोंगरकडा, सालापूर, रेडगाव, वडगाव, जवळापांचाळ, भाटेगाव यासह परिसरातील गावांचा समावेश आहे. तर वसमत तालुक्यातील कुरूंदा, गिरगाव यासह परिसरातील गावांचा समावेश आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार जीवककुमार कांबळे, शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने पंचनामे सुरु केले होते. यामध्ये कळमनुरी तालुक्यात 1049 हेक्टर वरील फळबागांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून वसमत तालुक्यात 528 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 5.77 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत नुकसानीची माहिती शासनाकडे सादर केली आहे. आता नुकसानीच्या मदतीसाठी निधी कधी उपलब्ध होणार याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.