
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वीज कंपनीला तब्बल ३.५० कोटींचा फटका बसला असून कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती वीज कंपनीचे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांनी मंगळवारी ता. ३० पत्रकार परिषदेत दिली.
.
येथील वीज कंपनीच्या कार्यालयात अधिक्षक अभियंता चव्हाण यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी कार्यकारी अभियंता मुंगारे यांची उपस्थिती होती. यावेळी चव्हाण म्हणाले की, मागील चार महिन्यात वीज कंपनीला वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी खांब पडले असून रोहित्र नादुरुस्त झाले तर काही ठिकाणी वीज वाहिन्यात तुटुन पडल्या आहेत. यामध्ये मे महिन्यात वादळी वाऱ्याने ६४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर जून महिन्यात ५० लाख रुपये ऑगस्ट महिन्यात १.३२ कोटी रुपये तर सप्टेंबर महिन्यात १.०३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यातील नुकसान आणखी वाढू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यात स्मार्ट मिटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र या स्मार्ट मिटर बाबत विनाकारण अफवा पसरविल्या जात आहेत. स्मार्ट मिटरमध्ये जास्त वेगाने रिडींग घेतली जात असल्याच्या अफवा असून असा कुठलाही प्रकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट मिटरमुळे वीज रिडींगमध्ये अचूकता येऊन योग्य देयक मिळणार आहे. विशेष म्हणजे मिटर बसविण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. कोणी शुल्क मागत असेल तर त्या संदर्भात तक्रार करण्याचे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले आहे. महाविद्युत मोबाईल ॲपच्या मदतीने किती वीज वापरली याची माहिती ग्राहकांना घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.