
हिंगोली जिल्ह्यात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता’ स्वातंत्र्याचा उत्सव, स्वच्छतेसोबत ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवा
.
जलशक्ती व सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ‘घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता’ स्वातंत्र्याचा उत्सव, स्वच्छतेसोबत अंतर्गत स्वातंत्र्य दिन विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा उत्सव लोकसहभागातून साजरा करणे आणि त्याचवेळी स्वच्छता, सुजलता व आरोग्याची जोड देणे असा या मोहिमेचा उद्देश आहे.
या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून जनजागृती करण्यात आली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा, सार्वजनिक स्वच्छता मोहीम, पाणी, स्वच्छता व आरोग्य या मालमत्तांची स्वच्छता करणे, जनजागृतीबाबत उपक्रम राबविणे, जलसंवर्धनाचे उपक्रम राबविले जाणार आहे. त्यानंतर ता. १५ ऑगस्ट रोजी अमृत सरोवर व सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण केले जाणार आहे.
या मोहिमेसाठी ‘हर घर स्वच्छता’ व ‘हर घरी तिरंगा’ हे हॅशटॅग वापरून समाजमाध्यमांवर जनजागृती केली जात असून जिल्हयातील सर्व गावकऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. नोंदविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी यानी केले आहे.
दरम्यान, या मोहिमेच्या जनजागृतीसाठी तसेच नागरीकांचा सहभाग वाढविण्यासाठी पाणी व स्वच्छता मिशनचे महेश थोरकर, भास्कर देशमुख, रघुनाथ कोरडे, विशोर पडोळे, राधेश्याम गंगासागर, सरकटे, शामसुंदर मस्के यांनी नियोजन केले असून त्यानुसार गावपातळीवर जनजागृती केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.