digital products downloads

हिंदी भाषेबाबत अंतिम निर्णय सात दिवसात: त्रिभाषा सूत्राला राज्यभरातून विरोध, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे करणार तज्ञांशी चर्चा – Mumbai News

हिंदी भाषेबाबत अंतिम निर्णय सात दिवसात:  त्रिभाषा सूत्राला राज्यभरातून विरोध, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे करणार तज्ञांशी चर्चा – Mumbai News


महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असून या निर्णयाला राज्यभरातून मोठा विरोध केला जात आहे. राज्यभरातून होणारा विरोध लक्षात घेता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हिंदी भाषेबाबतचा अंतिम निर्णय

.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, इतर राज्यांची भाषा व त्यांचे धोरण, तसेच हिंदीबाबतचे धोरण या मुद्द्यांवर सरकारची भूमिका समजावून सांगणार आहेत. यासोबतच, या धोरणाला विरोध करणाऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे, याचीही माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर या संपूर्ण बाबींचा समावेश असलेला एक समग्र अहवाल तयार करण्यात येईल, आणि त्यानुसार सरकार निर्णय घेईल, अशी माहिती मिळाली आहे.

त्रिभाषा सूत्रावर ठाम असलेल्या सरकारने आता थोडी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. या मुद्द्यावर सर्व राजकीय नेते आणि तज्ञांशी सल्लामसलत करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत साहित्यिक, भाषातज्ज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्याचे ठरले आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासह विविध पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्यात येणार आहे.

दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेणार

हिंदी भाषा आणि त्रिभाषा सूत्रावरुन राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे याची माहिती देण्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. राज ठाकरेंनी हिंदी भाषेच्या सक्तीला आणि त्रिभाषा सूत्राला विरोध केला आहे. पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवून मागच्या दारानं हिंदी लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. तसेच राज ठाकरे यांनी सरकार आणि शेळच्या मुख्याध्यापकांनाही इशारा दिला आहे.

साहित्यिक तारा भवाळकर यांचाही विरोध

त्रिभाषा सूत्र आणि हिंदीसक्तीविरोधात मराठी साहित्यवर्तुळातूनही नाराजीचा सूर उमटत आहे. विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांनी यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्रिभाषा सूत्रावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे. तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी इयत्ता चौथीपर्यंत केवळ मातृभाषेचाच अभ्यासक्रम असावा, अशी स्पष्ट सूचना केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp