
संपूर्ण महाराष्ट्र पंढरपूरच्या वारीच्या उत्साहात न्हालेला असताना, अकोला जिल्ह्यातून वारकरी संप्रदायासाठी अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. बाळापूर तालुक्यातील व्याळा गावचे ज्येष्ठ संत ह. भ. प. नारायण महाराज तराळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 98 व
.
नारायण महाराज यांचे पार्थिव त्यांच्या मूळ व्याळा गावात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. उद्या, रविवार सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. महाराष्ट्रभरातील अनेक वारकरी मंडळी, ह. भ. प., संत, महाराज आणि कीर्तनकार त्यांच्या अंत्यसंस्काराला हजर राहणार आहेत.
सलग 60 वर्षे केली पंढरीची वारी
नारायण महाराज तराळे यांनी केवळ नवव्या वर्षीच वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेतली. त्यानंतर तब्बल 60 वर्षे सलग त्यांनी पंढरपूरची वारी केली. त्यांच्या कीर्तनातून त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही वारकरी परंपरेचा संदेश पोहोचवला. वारकरी संप्रदायाचा प्रचार करत त्यांनी अनेक पिढ्यांना अध्यात्माची वाट दाखवली.
तराळे महाराजांचे ‘विरह अभंग’ होते प्रसिद्ध
ह. भ. प. नारायण महाराज हे त्यांच्या ‘विरह अभंग’साठी विशेष प्रसिद्ध होते. पांडुरंगाविषयीचा गहिवर, भक्तीतील विरह आणि माऊलीच्या प्रती येणाऱ्या भावनांना त्यांच्या अभंगांतून अचूक आणि हृदयस्पर्शी स्वरूप दिले जायचे. त्यांच्या अभंगांनी कित्येक वारकऱ्यांना विठ्ठलभक्तीत न्हाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.