digital products downloads

’10 जण मिळून आले आणि त्यातील 9 जणांनी….’, बीडमधील पीडितेने सांगितला धक्कादायक घटनाक्रम, ‘बेशुद्ध होईपर्यंत….’

’10 जण मिळून आले आणि त्यातील 9 जणांनी….’, बीडमधील पीडितेने सांगितला धक्कादायक घटनाक्रम, ‘बेशुद्ध होईपर्यंत….’

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे एका महिलेला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली असून, यानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला सरपंच व इतर दहा जणांनी 14 एप्रिल रोजी लाकडी काठी व रबरी पाईपने मारहाण केली. या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी पुढे येत असून वडगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपी सध्या फरार आहेत. 

पीडित महिलेने सांगितलं आहे की, “मंदिरावरील भोंगे आणि गिरण्यांची मी ज्या आधी तक्रारी दिल्या होत्या, त्यासाठी मला मारहाण करण्यात आली. मला पोलिसांनी सहकार्य केलं. आज मी पोलिसांमुळेच जिवंत आहेत. पोलिसांनी मला खूप सहकार्य केलं. 10 जण मिळून आले होते, त्यातील 9 जणांनी मला बेदम मारहाण केली. एकजण हिला खल्लास करुन टाका, जिवंत सोडू नका असं म्हणत घाणेरड्या शिव्या देत होता. मी बेशुद्ध होईपर्यंत मला मारलं आहे”.

बीड आहे की बिहार? सरपंचासह 10 जणांकडून महिलेला काठी आणि पाईपने मारहाण, अंगावर दिसेल तिथे जखमा

 

“या सर्वांवर मकोका लावावा अशी माझी मागणी आहे. त्यांना जामीन देण्यात येऊ नये. त्यांनी माझा खून करण्याचा प्रयत्न केला,” असंही त्यांनी म्हटलं आहे. “सरपंच हे पद साधं नसतं. सगळ्यांना घेऊन चालणं अपेक्षित असतं. हा त्या लायकीचा नसल्याने त्याचं सरपंचपद रद्द करावं. मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे. माझ्या घरचं कोणी नसताना, कोणी मदत करु शकणार नाही याची खबरदारी घेऊन त्याने हल्ला केला. माझे हात, डोकं, पाठ सगळीकडे मारहाण केली आहे. त्यामुळे आधी सरपंचपद रद्द करावं. यांना अजिबात जामीन देऊ नये. एकतर संरक्षण द्या किंवा आमचं स्थलांतर करा,” अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

पोलिसांनी काय सांगितलं आहे?

14 एप्रिल रोजी 6 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वरी श्रीधर अंजन (रा. सानगाव, ता. अंबाजोगाई. जि. बीड) यांना गावातील मंदिरावर लावलेल्या स्पीकर, भोंगे, गावातील पीठाच्या चक्की द्वारे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत बाबत वेगवेगळ्या कार्यालयात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून तसंच कोर्टात सुरू असलेल्या खुनाच्या प्रयत्नाची केस काढून घे म्हणत सनगाव गावातील सरपंच व इतर नऊ आरोपींनी त्याना, त्यांचे चुलते श्रीधर अंजन, चुलती अर्चना अंजन याना लाकडी काठ्या व रबरी पाईपने मारहाण केली. तक्रारीच्या आधारे युसूफ वडगाव पोलिस ठाणे गु. र. क्र. 113/2025 कलम ११८(२), 118(1), 115(2), 74, 189(2), 190, 191(2), 352, 351(2) BNS प्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुण्यातील आरोपीचा युसूफ वडगाव पोलिस ठाणे येथील तपास पथक शोध घेत आहे. 

बीड जिल्ह्याचा बिहार झालाय का?

बीड जिल्ह्याचा बिहार झालाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण बीडमधील राजकीय गुन्हेगारी राजकीय लोकप्रतिनिधींपासून थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत झिरपल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड हा परळीचा नगरसेवक होता. शिवाय आमदार धनंजय मुंडेंचा तो उजवा हात होता. विष्णू चाटे राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष होता. खोक्या भाईसुद्धा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. शिवाय भाजपच्या एका सेलचा तो पदाधिकारीही होता. एवढंच नाही तर ज्या संतोष देशमुखांच्या मारेक-यांना फाशी मिळावी यासाठी लढा देणा-या धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकर यानंही एका तरुणाला अमानूष मारहाण केली. दादासाहेब खिंडकरची दादागिरी कमी की काय आता सेनगावच्या सरपंचाची दादागिरी समोर आली आहे. बीडमधील या राजकीय गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांनाही यश येताना दिसत नाहीये. बीडमध्ये अनेक गुन्हेगारी टोळ्या अस्तित्वात असल्याचं सांगण्यात येतंय.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp