
Ganpati Festival 2025: गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात जातात. मात्र कोकणात जाण्याऱ्या सर्व ट्रेनचे रिझर्व्हेशन फुल्ल झाले आहेत. तर मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अद्यापही काही ठिकाणी माहामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळं रस्ते मार्गे प्रवास करणेदेखील मोठे मुश्कील आहे. पण गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासाचा एक अतिजलद पर्याय उपलब्ध होणार आहे.
मुंबई विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग रो रो सेवा गणेश चतुर्थीपूर्वी दोन – तीन दिवस आधी रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. त्यानुसार विजयदुर्ग येथील जेट्टीत सुधारणा करण्यासह मुंबईतील माझगाव येथे रो रो सेवेच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हे काम 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून तात्काळ रो रो सेवेच्या चाचण्या (ट्रायल रन) करण्यात येणार आहेत. ही सेवा सुरू झाल्यास गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात, विजयदुर्ग, देवगडला केवळ सहा तासांत पोहोचता येणार आहे. रो रो सेवेच्या दिवसाला दोन फेऱ्या (येणारी जाणारी) होणार असून या वेळी बोटीतून एका वेळी 50 ते 60 चारचाकी वाहने आणि 400 ते 500 प्रवासी जाऊ शकतील.
मुंबई – विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग रो रो सेवा
मुंबई ते मांडवा अशी रो रो सेवा पुरविणाऱ्या एम टू एम कंपनीची एक बोट मुंबई ते विजयदुर्गदरम्यान धावणार आहे. ही बोट दोन ते तीन मजली आहे. देवगड, मालवण, राजापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा एक चांगला पर्याय असेल आणि याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र सागरी मंडळाने व्यक्त केला. तेथे पोहोचण्यासाठी कोकण रेल्वेने किमान 10 ते 11 तास प्रवास करावा लागतो, तर एसटीने वाहतूक कोंडीचा सामना करीत 14 तासांहून अधिक वेळ लागतो. लवकरच दर निश्चित करून जाहीर करण्यात येतील. त्यानंतर आरक्षणाला सुरुवात होईल.
रो-रो सेवेचे तिकीट दर किती असतील?
रो-रो सेवेचे अंदाजित तिकीट दर खालीलप्रमाणे आहेत: प्रवाशांसाठी: 600 ते 1000 रुपये तर वाहनांसाठी: 1500 ते 2000 रुपये असून अंतिम दर लवकरच जाहीर केले जातील.
सिंधुदुर्ग रो-रो सेवेबाबत FAQ
1) मुंबई-विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग रो-रो सेवा कधी सुरू होणार आहे?
ही सेवा गणेश चतुर्थी 2025 च्या दोन ते तीन दिवस आधी सुरू होणार आहे. चाचण्या (ट्रायल रन) 20 ऑगस्ट 2025 नंतर सुरू होतील.
2) रो-रो सेवेचा प्रवास किती वेळात पूर्ण होईल?
मुंबई ते विजयदुर्ग, देवगड, आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सागरी मार्गाने प्रवास केवळ 6 तासांत पूर्ण होईल.
3) रो-रो बोटीची क्षमता किती आहे?
एका फेरीत 50 ते 60 चारचाकी वाहने आणि 400 ते 500 प्रवासी प्रवास करू शकतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.