
Vasai Crime: माणुसकीच्या चिंधड्या उडवणारी घटना वसईतून समोर आलीय. एका 12 वर्षीय बांगलादेशी मुलीने मानव तस्करीच्या क्रूर वास्तव उघड केले आहे. वसईच्या नायगांव येथे नुकत्याच उघडकीस आलेल्या देहविक्री रॅकेटमधून तिची सुटका करण्यात आली. तिने सांगितले की, गेल्या तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या मुलीची 26 जुलै रोजी सुटका झाली, जेव्हा एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी मीरा-भाईंदर वसई-विरार (MBVV) पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकासह संयुक्त कारवाई केली. या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे.
200 हून अधिक पुरुषांनी केला अत्याचार
हार्मनी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अब्राहम माथाई यांनी सांगितले की, बाल सुधारगृहात या 12 वर्षीय मुलीने आपली व्यथा मांडली. तिला प्रथम गुजरातमधील नाडियाद येथे नेण्यात आले आणि तिथे तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही मुलगी अजून किशोरवयातही प्रवेशली नसताना तिचे बालपण या क्रूरकर्म्यांनी हिरावून घेतले आहे.
बांगलादेशातून भारतात कशी आली?
माथाई यांनी सर्व 200 गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “ही मुलगी शाळेत एका विषयात नापास झाली होती. कठोर पालकांच्या भीतीने ती एका ओळखीच्या महिलेसोबत पळून गेली. त्या महिलेने तिला गुप्तपणे भारतात आणले आणि देहविक्रीच्या दलदलीत ढकलले.
”पोलिसांकडून संपूर्ण रॅकेट उघडण्याचे प्रयत्न
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिस संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली.
हार्मोनल इंजेक्शन्सचा वापर
संकटातून गेलेली ही एकमेव मुलगी नाही, असे माथाई यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या मधु शंकर यांनी याला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, “वाशी आणि बेलापुर परिसरात मी अनेकदा अल्पवयीन मुलींना भीक मागताना पाहिलं आहे. या मुलींना लहानपणी गावातून पळवून शहरात आणलं जातं आणि त्यांचे शोषण केले जाते. एक-दोन वृद्ध महिला त्यांची देखभाल करतात आणि त्यांना देहविक्रीसाठी भाग पाडतात. त्यांना हार्मोनल इंजेक्शन्स देऊन लवकर प्रौढ बनवले जाते.” या घटनेने मानव तस्करीच्या भयंकर वास्तवावर प्रकाश टाकला असून, समाज आणि प्रशासनाने याविरोधात ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
FAQ
1. ही घटना काय आहे?
वसईच्या नायगांव येथे एका 12 वर्षीय बांगलादेशी मुलीची देहविक्री रॅकेटमधून सुटका करण्यात आली. तिने सांगितले की, गेल्या तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
2. मुलीची सुटका कशी झाली?
26 जुलै रोजी एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी मीरा-भाईंदर वसई-विरार (MBVV) पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकासह संयुक्त कारवाई करून या मुलीची सुटका केली.
3. या प्रकरणात किती लोकांना अटक झाली आहे?
आतापर्यंत या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे.
4. मुलगी भारतात कशी आली?
मुलगी शाळेत एका विषयात नापास झाल्याने कठोर पालकांच्या भीतीने एका ओळखीच्या महिलेसोबत पळून गेली. त्या महिलेने तिला गुप्तपणे भारतात आणले आणि देहविक्रीच्या रॅकेटमध्ये ढकलले.
5. मुलीवर कोणत्या प्रकारचे अत्याचार झाले?
गुजरातमधील नाडियाद येथे तिला नेण्यात आले, जिथे तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिला हार्मोनल इंजेक्शन्स देऊन लवकर प्रौढ बनवण्याचा प्रयत्नही झाला.
6. पोलिस काय करत आहेत?
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले की, पोलिस संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
7. या प्रकरणात कोणत्या स्वयंसेवी संस्थांनी भूमिका बजावली?
एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन या संस्थांनी पोलिसांना सहकार्य करून मुलीची सुटका केली.
8. मानव तस्करीच्या या प्रकरणात आणखी काय उघड झाले?
सामाजिक कार्यकर्त्या मधु शंकर यांनी सांगितले की, वाशी आणि बेलापुर परिसरात अनेक अल्पवयीन मुलींना गावातून पळवून आणले जाते, त्यांचे शोषण केले जाते आणि देहविक्रीसाठी भाग पाडले जाते. त्यांना हार्मोनल इंजेक्शन्सही दिले जातात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.