
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यासंदर्भातल भाजपचे जेष्ठ नेते माधव भांडारी यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा 26/11 हल्ल्यात वाटा असल्याचा दावा भांडारी यांनी केला आहे. भांडारी यांच्या या आरोपांनतर एकच खळबळ उडाली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यासंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. तत्कालीन सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 26/11 हल्ल्यात वाटा होता असा थेट दावा माधव भांडारी यांनी केला आहे. स्थानिक प्रशासनावर दबाव असलेल्या व्यक्तीचा या हल्ल्यात हात होता. स्थानिक मदतीशिवाय काहीही करता आलं नसतं असं भांडारींनी म्हटलं आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेल्या विक्रम भावे यांच्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भांडारी बोलत होते.
तर सरकार तुमचं आहे, यंत्रणा तुमची आहे. चौकशी करून जर कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर संविधानिक पदासाठी माधव भांडारी यांचा हा खटाटोप असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
दरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर माधव भांडारी यांनी आपल्या वक्तव्यावर सारवा सारवर केली. तत्कालिन सरकारला असा हल्ला होणार अशी माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली होती, तरीही त्यांनी काहीच हालचाल केली नाही, असं मी भाषणादरम्यान बोललो असा खुलासा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला.
माधव भांडारी यांनी 26/11 च्या हल्ल्यात थेट तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वाटा असल्याच्या केलेल्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता जोरदार राजकारण सुरू झालं आहेय
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.