digital products downloads

4 तासांचा प्रवास फक्त 90 मिनिटांत पूर्ण होणार; विरार अलिबाग कॉरिडॉर, महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी प्रकल्प

4 तासांचा प्रवास फक्त 90 मिनिटांत पूर्ण होणार; विरार अलिबाग कॉरिडॉर, महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी प्रकल्प

Virar Alibaug Multimodal Corridor : विरार ते अलिबाग हा 4 तासांचा प्रवास फक्त 90 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मागील नऊ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडॉरचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुन्हा एकदा 126  किमी लांबीच्या या रस्त्याच्या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर निविदा मागवल्या जातील.  गेल्या महिन्यात, बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर (बीओटी) मॉडेल अंतर्गत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम करण्याच्या एमएसआरडीसीच्या प्रस्तावाला सरकारी मान्यता मिळाली. सरकारच्या मंजुरीनंतर, महामंडळाने पुढचे पाऊल उचलले आहे.

Add Zee News as a Preferred Source

महामंडळाने बीओटी अंतर्गत प्रकल्पाचा अहवाल सरकारला सादर केला आहे. अहवाल मंजूर झाल्यानंतर, बीओटी वापरून विरार-अलिबाग कॉरिडॉर बांधण्यासाठी निविदा मागवल्या जातील. या प्रकल्पाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विरार ते अलिबाग दरम्यानचा प्रवास वेळ चार तासांवरून अंदाजे 90 मिनिटांपर्यंत कमी होईल. एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार  सरकार लवकरच अहवालाला मान्यता देईल अशी अपेक्षा आहे. ओबीटी अंतर्गत, या प्रकल्पाला सरकारऐवजी पूर्णपणे खाजगी कंपनीकडून निधी दिला जाईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, टोल वसूल केल्यानंतर रस्ता सरकारला सुपूर्द केला जाईल.

या प्रकल्पाचा डीपीआर पहिल्यांदा 2016 मध्ये तयार करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी अनेक वेळा निविदा मागवण्यात आल्या होत्या, परंतु कोणत्याही कंपनीने रस दाखवला नाही. काही महिन्यांपूर्वी कंपन्यांनी मागवलेल्या निविदेपेक्षा ३६% जास्त बोली लावल्या. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, एमएसआरडीसीने बीओटी तत्त्वावर प्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतला आहे. भूसंपादन प्रक्रिया जलद करण्यासाठी, सरकारने 2000 कोटी रुपयांची बँक हमी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यासाठी वापरली जाईल.

126 किमी लांबीचा हा कॉरिडॉरचे बांधकाम दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. पहिला टप्पा पालघरमधील नवघर आणि पेणमधील बालावली दरम्यानचा 96,410 किमीचा असेल. एकदा पूर्ण झाल्यावर, हा रस्ता एमएमआरच्या कोणत्याही भागात तासांऐवजी काही मिनिटांत पोहोचणे शक्य करेल. हा रस्ता एनपीटी, नवी मुंबई विमानतळ, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, मुंबई-गोवा महामार्ग, पनवेल-जेएनपीटी आणि अटल सेतू यांना जोडणार आहे.

FAQ

प्रश्न 1: विरार-अलिबाग कॉरिडॉर काय आहे?
उत्तर: विरार-अलिबाग कॉरिडॉर हा 126 किमी लांबीचा रस्ता आहे जो विरार ते अलिबाग दरम्यानचा प्रवास वेळ चार तासांवरून अंदाजे 90 मिनिटांपर्यंत कमी करेल.

प्रश्न 2: या प्रकल्पाचे बांधकाम कधी सुरू होणार आहे?
उत्तर: या प्रकल्पाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे, कारण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रश्न 3: या प्रकल्पासाठी किती खर्च येणार आहे?
उत्तर: या प्रकल्पासाठी किती खर्च येणार आहे याची माहिती नाही, परंतु हा प्रकल्प बीओटी (बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर) मॉडेल अंतर्गत बांधला जाणार आहे, ज्याचा अर्थ हा प्रकल्प खाजगी कंपनीकडून निधी दिला जाईल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp