
Mumbai To Konkan Ro Ro Service: मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग रो-रो बोटसेवा अंतर्गत ‘एम टू एम’ ही ‘प्रिन्सेस’ बोट आज संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी विजयदुर्ग बंदरात दाखल झाली. मुंबईहून निघालेल्या या बोटीची जयगड आणि विजयदुर्ग या ठिकाणी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे.
राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतील ही सागरी रो रो सेवा कोकणच्या पर्यटन वृद्धीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. आजचा दिवस कोकण वासीयांसाठी ऐतिहासिक. रो-रो सेवेची आज यशस्वी चाचणी झाली आहे. उद्या ही बोट पुन्हा मुंबई कडे जाणार आहे. येत्या दोन दिवसांत रोरो सेवा पॅसेंजरला घेऊन कोकणात येणार आहे. त्यामुळे रोजगार, व्यापार आणि पर्यटन या सर्वामध्ये कोकण आता गतीमान पद्धतीने पुढे जाईल व रोरो सेवा कोकणासाठी गेमचेंजर ठरणार आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
रो-रो सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मुंबईतून रत्नागिरीला किंवा सिंधुदुर्गला पोहोचण्यासाठी 10 ते 12 तास लागतात. मात्र रोरो सेवा सुरू झाल्यानंतर फक्त 3 ते साडेपाच तासांत प्रवास पूर्ण होणार आहे. मुंबई ते रत्नागिरीतल्या जयगडपर्यंत पोहोचण्यासाठी 3 ते 3.5 तासांचा वेळ आणि सिंधुदुर्ग ते विजयदुर्गपर्यंत पोहोचण्याचा वेळ 5 ते 5.5 तास इतका वेळ लागणार आहे.
FAQ
1. मुंबई-कोकण रो-रो फेरी सेवा काय आहे?
मुंबई-कोकण रो-रो फेरी सेवा ही भाऊचा धक्का (मुंबई) येथून रत्नागिरी (जयगड) आणि सिंधुदुर्ग (विजयदुर्ग) यांना जोडणारी जलदगती फेरी सेवा आहे. ही सेवा 1 सप्टेंबर 2025 पासून हवामान स्थिर झाल्यावर सुरू होणार आहे.
2. या फेरी सेवेचे वैशिष्ट्य काय आहे?
ही फेरी, एम2एम प्रिन्सेस, 25 नॉट्सच्या (सुमारे 46 किमी/तास) वेगाने धावणार असून, ती दक्षिण आशियातील सर्वात वेगवान फेरी आहे. ही सेवा रस्त्यावरील 10-12 तासांच्या प्रवासाला 3-5.5 तासांपर्यंत कमी करेल.
3. फेरीचा प्रवास किती वेळात पूर्ण होईल?
मुंबई ते जयगड (रत्नागिरी): 3 ते 3.5 तास
मुंबई ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग): 5 ते 5.5 तास
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.