
- Marathi News
- National
- ‘Kavach’ Ends; Kejriwal Now Faces The Challenge Of Saving The Party, The Real Test Is Now
नवी दिल्ली2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सन २०११ मध्ये भ्रष्टाचारविरोधी आंदोलन छेडून देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २ ऑक्टोबर २०१२ रोजी आम आदमी पार्टी हा पक्ष स्थापन केला होता. २०१३ च्या वर्षअखेर त्यांनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकी उडी घेतली. त्यात २८ जागा जिंकून काँग्रेसच्या साथीने आम आदमी पार्टी सत्तेवर आली.
२०१५ मध्ये पुन्हा आम आदमी ७० पैकी ६७ जागा जिंकून त्यांनी नवा इतिहास रचला. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा सन २०२० मध्ये ६२ जागा जिंकून आप सत्तेवर आला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर पहिले वर्ष वगळल्यास केजरीवाल सतत सत्तेत राहिले आहेत. आता पक्ष आणि स्वत:ही पराभूत झाल्यानंतर केजरीवाल प्रथमच विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यासमोर आता पक्ष वाचवण्याचे व पक्षाला नवी दिशा देण्याचे आव्हान आहे.
भ्रष्टाचार : चौकशीला वेग, नवा खटला, अटक शक्य
सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता म्हणाले, निवडणुकीत पराभूत झाल्याने जुन्या घोटाळ्यांतील कायदेशीर कारवाईत बदल होणार नाही आणि सुरक्षा कवचही मिळणार नाही. मद्य धोरण घोटाळ्यातील न्यायालयाची कार्यवाही सुरूच राहील. सुरुवातीला पुरावे गोळा करण्यात तपास संस्थांना अडथळे येत होते. ते आता दूर झाले आहेत. ठोस पुरावे मिळाल्यानंतर सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय नव्याने चौकशी सुरू करू शकतात. सध्या शीशमहल आणि जलबोर्ड प्रकरणाचा तपास सुरू आहे. मंत्री अथवा मुख्यमंत्री असल्याने चौकशी व अटकही शक्य.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.