
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचे काल पुण्यातून अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर तो बँकॉकला जात असल्याचे समोर आले. यासाठी ऋषिराज सावंतने विमान बूक केले. या विमानासाठी त्याने तब्बल 68 लाख रुपये मोजले. मात्र, ऋषिराज साव
.
तानाजी सावंत यांनी संपूर्ण ताकद लाऊन बँकॉकसाठी उड्डाण केलेले विमान परत पुण्यात लँड करवले. याची जराशी देखील कल्पना ऋषिराजला आली नाही. पुण्यात उतरल्यावर त्याला धक्काच बसला. मात्र तो बँकॉकला का जात होता याबद्दल माहिती मिळाली नव्हती. त्यानुसार पोलिस त्याची चौकशी करत होते. अखेर आपण बिझनेस ट्रीपसाठी बँकॉकला जात असल्याची कबुली ऋषिराजने दिली आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीत ऋषिराज सावंत यांच्यासोबत असलेल्या इतर 2 जणांचे पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. प्रवीण प्रदीप उपाध्याय आणि संदीप श्रीपती वसेकर यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले असून पोलिस तपासातून ही माहिती समोर आली आहे.
तसेच एका खासगी विमानाने 78 लाख 50 हजार रुपये देऊन ऋषीराज सावंत हे त्यांच्या 2 मित्रांना घेऊन बँकॉकच्या दिशेने निघाले होते. ऋषिराज यांनी त्यांच्या घरी बँकॉकबद्दल सांगितले आहे का नाही याबद्दल मित्र अनभिज्ञ होते. त्यातील एक मित्र सावंत यांच्या एका संस्थेत कार्यरत आहे, अशी माहितीही पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.
दरम्यान, या घटनेवर कॉंग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. नाना पटोले म्हणाले, हे सरकार सातत्याने सत्तेचा दुरुपयोग करत आहे, हा गुंडाराज सरकारने पोसलेला आहे. त्याला संरक्षण देण्याचे काम मंत्रालयातून आणि डीजी ऑफिसमधून सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांना वरून आदेश दिले जातात. संतोष देशमुख प्रकरण असो वा परभणी प्रकरण असो. सत्ता पक्षाचे आमदार पोलिसांना माफ करा असे सांगत आहेत. पण, पोलिस आणि प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.