digital products downloads

माझा जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यावर किती विश्वास ठेवायचा?: त्यांचा भांडाफोड संत कवयित्रींनी आधीच केलाय, मोदींवर संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांची अप्रत्यक्ष टीका – Mumbai News

माझा जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यावर किती विश्वास ठेवायचा?:  त्यांचा भांडाफोड संत कवयित्रींनी आधीच केलाय, मोदींवर संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांची अप्रत्यक्ष टीका – Mumbai News


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज दिल्ली येथे पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार उपस्थित होते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मंचावर उपस्थित होते. उद्घाटन

.

काय म्हणाल्या डॉ. तारा भवाळकर?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटन सोहळ्याप्रसंगी केलेल्या भाषणात डॉ. तारा भवाळकर पुढे म्हणाल्या म्हणाल्या, शिवला तर विटाळ होतो आणि दूसरा स्त्रीचा. निसर्ग धर्माने दिलेली मासिक पाळी तिची. त्यालाही विटाळ म्हणायचे. आता ही बाई कुठल्याही शाळा, कॉलेजमध्ये जात नाही, कुठल्याही स्त्री मुक्तीवालीकडे गेली नाही, तिला कुठली ‘सिमोन दि बोव्हा’ माहिती नव्हती. ती काय म्हणते? ‘देहाचा विटाळ, देहीचं जन्मला, शुध्द तो जाहला कवण प्राणी।। उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थानं। कोण देह निर्माण नाही जगी।।’ असा मला एखादा माणूस दाखवून द्या की, जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आला नाही.

पुढे बोलताना तारा भवाळकर म्हणाल्या, आता आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा वेगळा विषय आहे. परंतु, त्याचा भंडाफोड या आमच्या संत कवयित्रींनी 13 आणि 14 व्या शतकातमध्ये केला आहे. ज्यावेळेला लिपी आणि लिहिण्यावाचण्याला त्यांच्या जीवनात स्थान नव्हते. स्त्री मुक्तीच्या उद्गात्या आणि झेंडा फडकवणाऱ्या म्हणायचे की नाही? म्हणजे आजच्या स्त्री मुक्तीच्या विचारांना मागे सारतील अशाप्रकारचे विचार आमच्या या स्त्रियांनी, संत स्त्रियांनी निरनिराळया जातीजमातीच्या स्त्रियांनी त्यांच्या साहित्यातून मांडल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

लोकसभा निवडणुकीच्या काळात एका वृत्तवाहिनीशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले होते. मुलाखतीत पत्रकाराने विचारले होते की तुम्ही थकत का नाहीत? त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठवले आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या या विधानावर विरोधकांनी बरीच टीका केली होती. यावर आज पुन्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे.

‘फुरोगामी’ काहीही म्हणो, आमचे संत पुरोगामी होते:पंतप्रधान महाशय, तुम्हाला दिलेली विठ्ठल मूर्ती आमच्या उदारतेचे प्रतीक- तारा भवाळकर

संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुरोगामीत्वाचा उपहास करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. ‘फुरोगामी’ काहीही म्हणो, आमचे संत खरोखरच पुरोगामी होते. त्यामुळे पंतप्रधान महाशय, तुम्हाला भेट म्हणून दिलेली विठ्ठल – रुख्मिणीची मूर्ती ही आमच्या उदारपणाचे प्रतीक आहे, असे त्या म्हणाल्या. हेही वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp