digital products downloads

मविआच्या आमदारांनाही निधी देणार: नीतेश राणेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले – त्यांच्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता – Maharashtra News

मविआच्या आमदारांनाही निधी देणार:  नीतेश राणेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले – त्यांच्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता – Maharashtra News


महाविकास आघाडीच्या सरपंचाला एक रुपयाचाही निधी मिळणार नाही, असे वादग्रस्त विधान मंत्री आणि भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले होते. नीतेश राणे यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता, असे म्हणत महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्

.

भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात नुकताच भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना मंत्री नीतेश राणे यांनी निधी हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा. यापुढे महाविकास आघाडीच्या सरपंचाला एक रुपयाचाही निधी मिळणार नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे राज्याच्या राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिसाद उमटत होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? आम्हाला या महाराष्ट्राचा चौफेर विकास करायचा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेस सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनाही निधी दिला जाईल. महाराष्ट्राच्या विकासात कुठेही असमतोलता निर्माण होणार नाही किंवा कोणत्याही मतदारसंघाचा विकास थांबू नये, ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्राचा पूर्ण विकास करणे ही महायुती सरकारची, देवेंद्र फडणवीसांची भूमिका आहे. कोणताही मतदारसंघ विकासामध्ये मागे राहणार नाही, त्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनाही निधी देणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

नेमके काय म्हणाले होते नीतेश राणे? विरोधी बाकावर असताना मला खूप त्रास देण्यात आला. निधी देण्याच्या मुद्यावरूनही मला डावलण्यात आले. पण आता आगामी दिवसांत जिल्हा नियोजनाचा निधी असेल, पक्षाचा असो किंवा सरकारचा कोणताही निधी फक्त महायुतीच्या उमेदवारांनाच मिळेल. बाकी कुणालाही काही मिळणार नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, ज्या – ज्या गावात महाविकास आघाडीचे सरपंच आहेत त्यांची यादी काढा. त्या गावांना एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. गावाचा विकास हवा असेल तर त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल. सरकार तुम्हाला न्याय देईल, तसेच गावाच्या विकासालाही मदत करेल. निधी वाटपात महायुतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या गावांना प्राधान्य दिले जाईल. भाजपमध्ये प्रवेश केला तरच विकास होईल. उरले सुरले कुणी शिल्लक असतील तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असे विधान नीतेश राणे यांनी केले होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp