
अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगान गायल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अबू आझमीला औरंगजेबाच्या कबरीजवळ झोपवले पाहिजे, असा धमकीवजा इशारा नीतेश राणे यांनी दिला आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यावर फक्त निलंबनाची कारवाई करणार का? असा सवालही नीतेश राणे य
.
औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची नाही, तर कारभाराची लढाई होती, असे वादग्रस्त विधान सपाचे आमदार अबू आझमी यांनी केले होते. यावरून अबू आझमी यांच्यावर टीका होत आहे. अबू आझमींच्या विधानामुळे आज विधानसभेतही गोंधळ झाला होता.
अबू आझमीला औरंगजेबाच्या कबरीजवळ झोपवले पाहिजे
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले. मुघलांनी आपली हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली, लोकांचे धर्मांतर केले, शिवाजी महाराजांनी याविरुद्ध आवाज उठवला आणि जर अबू आझमी हे समजू शकले नाहीत तर माणसाला औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे, असा हल्लाबोल नीतेश राणे यांनी केला. तर त्याच्यावर फक्त निलंबनाची कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अबू आझमींनी इतिहास वाचावा शिवसेनेच्या महिला नेत्या शायना एनसी यांनीही अबू आझमींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. अबू आझमी यांनी प्रथम इतिहासाच वाचावा असा सल्ला, शायना एनसी यांनी आझमींना दिला. इतिहास वाचल्यानंतर औरंगजेबाने किती हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली, हे त्यांना कळेल. यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर आणि काशी विश्वनाथच्या शेजारी असलेले छोटे मंदिर समाविष्ट आहे. अबू आझमींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शायना एनसी यांनी केली आहे.
अबू आझमींच्या विधानावरून विधानसभेत गोंधळ अबू आझमी यांच्या औरंगजेबावरील वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अबू आझमींना निलंबित करावे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आली होती. औरंगजेबाचे गोडवे गायल्याबद्दल सपाचे आमदार अबू आझमी यांच्या गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली. औरंगजेबाचे गोडवे गाणे म्हणजे, आपल्या महापुरुषांचा, आपल्या देशभक्तीचा अपमान असल्याचे ते म्हणाले. औरंगजेबाचे गुणगान गाणाऱ्यांना सभागृहात बसण्याची अधिकार नाही. त्यांना निलंबित करून त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली. यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
नेमके काय म्हणाले होते अबू आझमी? मोगल बादशहा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्यात व छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती. उलट त्याच्याच काळात भारताला सोन्याची खाण म्हणून संबोधले जात होते, असा वादग्रस्त दावा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला आहे. औरंगजेबाची कबर खोदण्याबद्दल बोलणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत. सद्यस्थितीत महाराष्ट्रासह देशात मुस्लिमांवर अत्याचार वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी ‘सोने की चिड़िया’, असे म्हटले जात होते. असे असताना चुकीचे म्हणू का? छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.