
शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या पिकांना योग्य भाव दिला जात नाही. भारत देश हा कृषी प्रधान देश असे संबोधले जाते. मात्र भविष्यात शेतकरी हा इतिहास बनू नये, यासाठी मोदी सरकारने शेतकरी धोरण अंमलात आणलेल्या त्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात प्रहार सोशल फोरमचे ब
.
केंद्र सरकारने शेतकरी धोरण अंमलात आणले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव दिला जात नाही. कीटकनाशके, औषधी, खत बियाणे यांचे भाव वाढतीवर आहेत. खर्च वजा करून शेतकऱ्यांच्या हातात काहीही येत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन शेती करताना दिसत आहे. शेतकरी शेतीमधून पीक घेतात आणि त्यात घेतलेले कर्ज कुठून फेडायचे, त्यामुळे शेतकरी शेवटचा मार्ग निवडतात आणि आत्महत्या करतात.
भारत देश हा कृषी प्रधान देश आहेत, असे विद्यार्थ्यांना शिकविले जाते. भविष्यात विद्यार्थ्यांना शेतकरी विषयाचे धडे येऊ नये आणि शेतकरी इतिहास होऊ नये यासाठी प्रहार सोशल फोरमचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आर्वी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य फेकत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना पिकाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांचा अंत बघू नये, अशा प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालया मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.