
Men In Maharashtra Are More Depressed: व्यक्त होण्याबाबत महिला या पुरुषांपेक्षा आघाडीवर असतात. महिला अधिक भावूक असतात, असं म्हटलं जातं. पुरुष व्यक्त होत नाहीत, मनातील घालमेल जवळच्या व्यक्तीला सांगत नाहीत, असं पाहायला मिळतं. मात्र याच सवयीमुळे पुरुषांमध्ये ताणतणाव, नैराश्येचे प्रमाण अधिक असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. राज्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये नैराश्य अधिक असल्याचे दिसून आलं आहे. मानसिक आरोग्यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘टेलिमानस’ या हेल्पलाइनवर मदतीसाठी पुरुषांकडून येणारे कॉल महिलांच्या तुलनेत दुपटीहून अधिक असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
नेमकी काय आकडेवारी आली समोर?
राज्यात नैराश्येसंदर्भात समोपदेश करमाऱ्या या हेल्पलाइनवर मदतीसाठी आलेल्या एकूण कॉल्सपैकी 67.99 टक्के कॉल पुरुषांनी केले आहेत. तर महिलांनी केलेल्या कॉलची टक्केवारी केवळ 31.50 टक्के इतकी आहे. 0.012 टक्का पारलिंगी व्यक्तींनीही या संपर्क केलेल्यांमध्ये समावेश आहे, असं विश्लेषणात नमूद करण्यात आलं आहे. आलेल्या कॉल्सपैकी 71 टक्के कॉल हे 18 ते 45 या वयोगटातील व्यक्तींचे आहेत. मदत, समुपदेशनासाठी विचारणा करण्यासाठी त्यांनी येथे संपर्क साधल्याचे उपलब्ध माहितीद्वारे स्पष्ट झालं आहे.
कशासाठी येतात फोन?
नैराश्य, अस्वस्थता, चिंता, एकटेपणा, झोपेच्या तक्रारी यासाठी काय करावे, याबाबत विचारणा करण्यात आली. चिंता, ताणतणाव, नैराश्य, नातेसंबंध, कामाचा ताणतणाव, चिडचिडेपणा, एकटेपणा, वर्तणुकीतील बदल, झोप न येणे, अतिविचार, व्यसनाधीनता या समस्यांसाठी सर्वाधिक फोन येतात, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दहापैकी सात पुरुषांनी, तर तीन महिलांनी येथे मानसिक अनारोग्यासंबंधी मदत मागितली आहे. कामाच्या ठिकाणी असलेला ताण, बिघडलेल्या नातेसंबंधांच्या तक्रारी या प्रकरणांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे.
या शहरातील पुरुष सर्वाधिक निराश
राज्यात नैराश्येसंदर्भातील समोपदेशनासाठी सर्वाधिक कॉल हे कोल्हापूर जिल्ह्यातून आले आहेत. तर या यादीमध्ये मुंबई तिसऱ्या क्रमाकांवर असून संस्कृतिक राजधानीचं शहर असलेलं पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून 1 लाख 45 हजार 431 कॉल्स या केंद्रावर आले आहेत. त्यापैकी 85 हजार 650 कॉलचे विश्लेषण केले असता, मदतीसाठी 87.86 टक्के व्यक्तींनी विचारणा केली. आपत्कालीन स्थितीमध्ये 0.973 टक्के व्यक्तींनी फोन केल्याचं समोर आलं आहे. तसेच विनाकारण कॉलची संख्या 3.6 टक्के इतकी असल्याचं स्पष्ट झालं आहे. या आकडेवारीवरुन केवळ शहरी भागांमध्ये पुरुषांना नैराश्येचा सामना करावा लागतो हा समाज कुठेतरी चुकीचा ठरताना दिसतोय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.