digital products downloads

शेतकऱ्याच्या शेतात पिकली काळी हळद, पावडरचे दर ऐकून व्हालं आवाक्!

शेतकऱ्याच्या शेतात पिकली काळी हळद, पावडरचे दर ऐकून व्हालं आवाक्!

Success Story: आपण काळ्या हळदीबद्दल फार कधी ऐकलं नसेल. मात्र ही बहुगुणी हळद शेतकऱ्यांनाही मालामाल करु शकते. कारण या काळ्या हळदीचे दर हजारांच्या घरात आहेत. काळ्या सोन्याची यशोगाथा जाणून घेऊया.

ही हळद दिसायला पिवळ्या हळदीसारखीच दिसत असली तरी ही हळद पिवळ्या हळदीपेक्षाही जास्त भाव खाते. दिसायला काळी नसली तरी या हळदीला काळी हळद म्हणून ओळखलं जातं. अनेक औषधी गुणधर्म आणि आयुर्वेदिक महत्व असलेली काळी हळद नांदेडमधील अर्धापूर गावचे शेतकरी शिवार घेडेकर यांनी पिकवलीय. विशेष म्हणजे  काळ्या हळदीला 1 हजार रुपये किलो दर असून आयुर्वेदिक औषधांमध्ये काळ्या हळदीचा वापर होतो. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्येही काळ्या हळदीचा उपयोग होतो. अँटी ऑक्सिडीक असलेल्या काळ्या हळदीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 

शिवार घेडेकर यांनी 5 वर्षांपूर्वी प्रयोग म्हणून अर्धा किलो हळदीचं बियाणं ऑनलाईन मागवलं. प्रयोग यशस्वी झाला आणि त्यातून हळदीचे उत्पन्न निघालं. त्याच हळदीच्या बियाण्यांमधून त्यांनी यंदा 300 किलो हळद पिकवलीय. 

आयुर्वेदिक डॉक्टर, मोगडपल्ली मेडिकल चालक एक हजार रुपये किलोप्रमाणे घोडेकर यांच्याकडून ओली हळद विकत घेताहेत. विशेष म्हणजे सुकलेल्या हळदीचे आणि हळदीच्या पावडरचे दर तर तब्बल 5 ते 6 हजार रुपयांच्या घरात आहेत.

हळद ही मुळातच औषधी गुणधर्माची. पिवळ्या धम्मक रंगामुळे अगदी रोजच्या हळदीलाही जेवण, खाद्य उद्योगासह औषध, आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये खूप महत्त्व आहे. त्यात आता शेतकऱ्यांकडे काळ्या हळदीचा नवा हुकमी पर्यायही उपलब्ध झालाय. हजार रुपये किलोनं विकली जाणारी ही काळी हळद शेतकऱ्यांचं नशिब चमकवू शकते.

अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागतेय टँकरवर; उपाययोजना कधी करणार?

सध्या नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या तडाख्यात पाण्यासाठी नागरिकांची दररोजची पायपीट सुरू असून महिलांचे हाल होत आहेत. आजमितीला अर्ध्या महाराष्ट्राची तहान टँकरवर भागवावी लागत आहे. यंदा राज्यात उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच आता पाणीटंचाईचाही मोठा प्रश्न उभा ठाकलाय. राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळं गावागावात टॅंकरनं पाणीपुरवठा केला जात असल्याचं चित्र आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 1 हजार 384 गावं आणि वाड्यांवर 478 टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत.गेल्या आठवड्यात हा आकडा 223 होता, मात्र आठवडाभरात हा आकडा अडीचशेपेक्षा जास्त झालाय. सध्याच्या परिस्थितीला अर्ध्या महाराष्ट्राची तहान टँकरवर भागवण्याची वेळ आलीय.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp