
पहलगाम मध्ये झालेल्या पर्यटकांवरील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची भावना आहे. यामुळेच भारत आणि पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यातच आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील ही ‘आर या पार’ करण्याची वेळ असल्याचे म्हटले आहे. सीमेव
.
मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारला हा सल्ला दिला आहे. गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला चांगला धडा शिकवण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे.
या संदर्भात बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, मला राजकारणातले फारसे कळत नाही. मात्र, ही आर या पार करण्याची वेळ आली असल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख हिंदू आणि मुस्लिम वेगवेगळे असल्याचे म्हणत आहेत. त्यांना पाकिस्तान मध्ये असलेल्या हिंदूंची परवा नाही का? असा प्रश्न देखील त्यांना उपस्थित केला.
‘आर या पार’ करण्याची वेळ आली
पहलगाम हल्ल्यावर बोलताना गीतकार जावेद अख्तर म्हणाले की, “हे फक्त एकदाच नाही तर अनेक वेळा घडले आहे… मी केंद्र सरकारला आताच पावले उचलण्याची विनंती करतो. सीमेवर काही फटाके वाजवून चालणार नाही. आताच ठोस पाऊल उचलावी लागतील. असे काहीतरी करा की तिथल्या (पाकिस्तान) वेड्या लष्कर प्रमुखाला त्यांच्यासारखे भाषण करता येणार नाही. ते म्हणतात की हिंदू आणि मुस्लिम हे वेगवेगळे समुदाय आहेत. त्याला त्याच्या देशात हिंदू आहेत याचीही पर्वा नाही. तर, त्यांना आदर नाही का?… ते कोणत्या प्रकारचा माणूस आहे?… त्यांना योग्य उत्तर मिळायला हवे, जेणेकरून त्यांना लक्ष्यात राहील. मला राजकारणाबद्दल जास्त माहिती नाही. पण मला माहित आहे की ‘आर या पार’ करण्याची वेळ आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited



